Murali Vijay  Dainik Gomantak
क्रीडा

Murali Vijay Retirement: मुरली विजयची निवृत्तीची घोषणा, 'या' कारणामुळे घेतला मोठा निर्णय

भारतीय संघाचा फलंदाज मुरली विजयने मोठ्या कारणामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Pranali Kodre

Murali Vijay Retirement: भारताचा क्रिकेटपटू मुरली विजयने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने जगाभरात क्रिकेटच्या नव्या संधी आणि त्याच्यासंबंधीत व्यावसायाच्या संधींचा शोध घेण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

38 वर्षीय मुरली विजयने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 61 कसोटी, 17 वनडे आणि 9 आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट खेळले. त्याने निवृत्ती घेताना सर्वांचे आभारही मानले.

त्याने निवृत्तीची घोषणा करताना लिहिले की 'आज अतिशय कृतज्ञतेने आणि नम्रतेने मी सर्वप्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करत आहे. माझा 2002 ते 2018 ही सर्व वर्षे माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर वर्षे आहेत. सर्वोच्च स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.'

तसेच मुरली विजयने पुढे लिहिले की 'मला हे सांगतानाही आनंद होत आहे की मी जगाभरात क्रिकेटच्या नव्या संधी आणि त्याच्यासंबंधीत व्यावसायाच्या संधींचा शोध घेणार आहे. मी मला आवडत असलेल्या खेळ (क्रिकेट) खेळत राहाणार आहे आणि स्वत:ला एका वेगळ्या आणि नवीन वातावरणात आव्हान देत राहिल.'

'मला विश्वास आहे की क्रिकेटपटू म्हणून माझ्या प्रवासातील हा पुढचा टप्पा असेल आणि मला माझ्या आयुष्यातील या नव्या आध्यायाबद्दल उत्सुकता आहे. मी माझ्या संघसहकाऱ्यांना आणि भारतीय क्रिकेट संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.'

त्याचबरोबर त्याने त्याला संधी दिल्याबद्दल बीसीसीआय, तमिळनाडू क्रिकेट असोसिएशन आणि चेन्नई सुपर किंग्सचे आभार मानले आहेत. तसेच त्याने संघसहकारी, प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि चाहत्यांबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली आहे.

काही दिवसांपूर्वीच मुरली विजयने बीसीसीआयवर निशाणा साधताना तो परदेशात संधी शोधत असल्याचे स्पष्ट केले होते. त्याने डब्ल्यूव्ही रमण यांच्याशी बोलताना सांगितले होते की 'माझे बीसीसीआयबरोबर सर्व क्रिकेट खेळून झाले आहे आणि आता मी परदेशात संधी शोधत आहे. मला अजून थोडे स्पर्धांत्मक क्रिकेट खेळायचे आहे.'

दरम्यान, मुरली विजय भारताकडून अखेरचे 2018 साली खेळला होता. तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थमध्ये झालेल्या कसोटीत अखेरचे भारतीय जर्सीमध्ये दिसला होता. तसेच त्याने अखेरचा वनडे आणि टी20 सामना 2015 साली खेळला होता.

त्याने तमिळनाडूकडून 2019 साली अखेरचे सामने खेळले, तर आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्सकडून 2020 साली अखेरचे खेळताना दिसला होता.

त्याने आत्तापर्यंत कसोटीत 12 शतके आणि 15 अर्धशतकांसह 3982 धावा केल्या आहेत. तसेच वनडेत त्याने 1 अर्शतकासह 339 धावा आणि आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 169 धावा केल्या आहेत. तसेच त्याने आयपीएलमध्ये 106 सामन्यात 2 शतके आणि 13 अर्धशतकांसह 2619 केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: कशाला घाई केली मित्रा...! Shubman Gill चा स्वतःच्या पायावर धोंडा, भडकला गौतम गंभीर; टीम इंडिया अडचणीत

Goa Assembly: आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेवरुन आलेमाव बरसले, 'सत्तरी' पॅटर्नवर उपस्थित केले सवाल; वाचा दिवसभरातील घडामोडी

IND vs ENG: इंग्लंडमध्ये केएल राहुलचा जलवा, करिअरमध्ये पहिल्यांदाच नोंदवले 'हे' 3 मोठे रेकॉर्ड; लवकरच गावस्करांनाही सोडणार मागे!

महात्मा गांधी म्हणाले होते 'दारु सोडा', अवैध मद्य तस्करीवरुन विजय सरदेसाईंनी दिले PM मोदींच्या गुजरातचे उदाहरण

Viral Video: आजीबाईचा 'स्वॅग'च निराळा! सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय तूफान व्हायरल; तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT