क्रीडा

पंचवीस हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत भारताची कसोटी

गोमन्तक वृत्तसेवा

मेलबर्न: क्रिकेटविश्‍वाचे लक्ष लागून राहिलेल्या भारताच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यातील मेलबर्न येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तब्बल २५ हजार प्रेक्षकांना स्टेडियममध्ये स्थान देण्यात येणार आहे. तसे झाल्यास कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर क्रिकेट सामन्यासाठी प्रथमच प्रेक्षकांची उपस्थिती रहाणार आहे.

अमिरातीतील आयपीएल संपल्यानंतर भारतीय संघ लगेचच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. तीन एकदिवसीय, तीन ट्‌वेन्टी-२० आणि चार कसोटी सामने असा भरगच्च कार्यक्रम आहे. २७ नोव्हेंबर ते १९ जानेवारी असा दौऱ्याचा कार्यक्रम आहे.

कसोटी मालिका १७ डिसेंबरपासून ॲडलेड येथे प्रकाशझोतातील सामन्याने येथे सुरू होणार आहे. त्याने मेलबर्न येथे बॉक्‍सिंग डे अर्थात २६ डिसेंबरपासून दुसरा कसोटी सामना सुरू होईल, याच सामन्याला २५ हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीचा प्रयत्न केला जाणार आहे. मेलबर्नच्या स्टेडियमची क्षमता लाखभराची आहे म्हणजेच एक चतुर्थांश स्टेडियम भरलेले दिसेल.

‘कोव्हिडमुक्त’ प्लान
व्हिक्‍टोरिया राज्य सरकार, मेलबर्न क्रिकेट क्‍लब आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया मिळून प्रेक्षकांच्या उपस्थितीसाठी ‘कोव्हिड मुक्त’ प्लान तयार करत आहेत. त्यामुळे प्रेक्षक तसेच क्‍लब सदस्यांना कसोटी सामन्याचा आनंद घेता येईल. कोव्हिडमुक्त आचारसंहितेनुसार आम्ही व्हिक्‍टोरिया सरकारबरोबर आखणी करत आहोत, अशी माहिती मेलबर्न क्रिकेटचे मुख्य कार्यकारी स्टुअर्ट फॉक्‍स यांनी दिली.
महिलांचा वर्ल्डकप अंतिम सामना मेलबर्न क्रिकेटच्या याच मैदानावर ८३ हजार प्रेक्षकांच्या उपस्थिती भारत आणि ऑस्ट्रेलियात ८ मार्च रोजी महिलांचा विश्‍वकरंडक अंतिम सामना झाला होता. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि क्रिकेटलाही ब्रेक लागला होता.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘’प्रमोद सावंत सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री, त्यांच्या 1000 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करा’’; अलका लांबा यांचा हल्लाबोल

Ranbir Alia Video: रणबीरच्या मुंबई सिटीकडून गोव्याचा पराभव, आलियासोबत विजयी जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल

Smart City Panaji: स्मार्ट सिटी पणजीच्या खोदकामात आढळली रहस्यमय मूर्ती

Kala Academy: गोविंद गावडे कोणाला वाचवत आहेत? सल्लागाराकडे दाखवले बोट

Economic Crisis: पाकिस्तानचा कैवारी बनणाऱ्या देशाला वाढत्या महागाईनं ग्रासलं; दोन वेळच्या अन्नासाठी जनता करतेय संघर्ष!

SCROLL FOR NEXT