Team India Dainik Gomantak
क्रीडा

India vs Bangladesh: अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची विजयी सुरुवात; बांगलादेशचा 84 धावांनी उडवला धुव्वा!

India vs Bangladesh Under 19 World Cup: भारताने अंडर-19 विश्वचषक 2024 ची सुरुवात विजयाने केली आहे.

Manish Jadhav

India vs Bangladesh Under 19 World Cup: भारताने अंडर-19 विश्वचषक 2024 ची सुरुवात विजयाने केली आहे. ब्लोमफॉन्टेन येथील मॅंगॉंग ओव्हल येथे झालेल्या सामन्यात भारतीय अंडर-19 संघाने बांगलादेशचा 84 धावांनी पराभव केला. बांगलादेशविरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत 7 गडी गमावून 251 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 45.5 षटकांत केवळ 167 धावाच करु शकला. बांगलादेशकडून मोहम्मद जेम्सने 54 धावांची खेळी केली. भारताकडून सौम्या पांडेने सर्वाधिक 4 बळी घेतले.

दरम्यान, 252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात चांगली झाली होती पण पॉवरप्लेमध्ये टीमने तीन गडी गमावले. बांगलादेशची पहिली विकेट सातव्या षटकात पडली. आलम 14 धावा करुन बाद झाला. यानंतर सौम्या पांडेने रिझवान (0) आणि रेहमान (14) यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अहरारला 15 चेंडूत 5 धावा करता आल्या. आरिफुलने 71 चेंडूत 41 धावांची खेळी खेळली. रहमानने 4 धावा केल्या. जेम्स 54 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. भारतीय डावाचा पाया आदर्श (96 चेंडूत 76 धावा) आणि कर्णधार उदय सहारन (94 चेंडूत 64 धावा) यांनी रचला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 23.5 षटकांत 116 धावांची भागीदारी केली. मात्र, बांगलादेशच्या फिरकीपटूंसमोर हे दोन्ही फलंदाज धडपडताना दिसले नाहीत.

दुसरीकडे, बांगलादेशच्या दोन्ही फिरकीपटूंनी भारतीय फलंदाजांना मोकळेपणाने खेळू दिले नाही. आदर्शने 6 चौकार मारले, तर उदयला केवळ चार चौकार मारता आले. भारतीय फलंदाजांनी 50 षटकांत केवळ 14 चौकार आणि दोन षटकार मारले. बांगलादेशच्या गोलंदाजांनी 156 चेंडू टाकले ज्यावर एकही धाव झाली नाही. भारतीय डावातील ही 26 षटकांची आहे. भारतीय संघाचा फिनिशर सचिन धसने डेथ ओव्हर्समध्ये चांगली फलंदाजी केली आणि 20 चेंडूत 26 धावा केल्या, ज्यामुळे संघ 250 धावांचा आकडा पार करण्यात यशस्वी ठरला. वेगवान गोलंदाज रोहनात डौला बोर्सनच्या गोलंदाजीवर मारलेला षटकार पाहण्यासारखा होता.

दरम्यान, पहिल्यांदा फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. चौथ्या षटकात अर्शिन कुलकर्णीची (7) विकेट संघाने गमावली. आठव्या षटकात भारताची दुसरी विकेट पडली. मुशीर खानला केवळ 3 धावा करता आल्या. सलामीवीर आदर्श ने कर्णधार उदय सहारनसोबत शतकी भागीदारी केली. आदर्श 96 चेंडूत 76 धावा करुन बाद झाला. कर्णधार उदय सहारन 94 चेंडूत 64 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. अविनाशने 17 चेंडूत 23 तर प्रियांशू मोलियाने 42 चेंडूत 23 धावा केल्या. अभिषेक 4 धावा करुन बाद झाला. अंडर-19 विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय संघ सर्वाधिक यशस्वी ठरला आहे. भारताने या स्पर्धेची ट्रॉफी एकूण 5 वेळा जिंकली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'जोपर्यंत भारताचे तुकडे-तुकडे होत नाहीत, तोपर्यंत शांतता नाही', बांगलादेशच्या निवृत्त जनरलनं पुन्हा ओकली गरळ

Raja Mantri Predictions: 2026 मध्ये गुरु 'राजा' तर मंगळ 'मंत्री'! नवीन वर्ष जगात आणि देशात काय मोठे बदल घडवणार?

Goa ZP Election: भाजपची तिसरी यादी जाहीर! जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आणखी 9 उमेदवारांची नावे निश्चित; आतापर्यंत 38 जागांवर कमळाचे उमेदवार

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; हार्दिक-गिलचे पुनरागमन

अखेर न्याय मिळाला! 21 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापाला कोर्टाचा दणका, सुनावली 10 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

SCROLL FOR NEXT