IND vs ENG T20 World Cup
IND vs ENG T20 World Cup Dainik Gomantak
क्रीडा

IND vs ENG T20 World Cup: टीम इंडियाला 'या' 5 कारणांमुळे मिळू शकते तिकीट टू फिनाले...

गोमन्तक डिजिटल टीम

IND vs ENG T20 World Cup: टी-20 वर्ल्ड कपमध्ये आज भारत आणि इंग्लंड यांच्यात सेमी फायनल खेळी जाणार आहे. या सामन्यात इंग्लडच्या तुलनेत भारताचे पारडे जड असणार आहे. टीम इंडियाकडे असे पाच फॅक्टर्स आहेत, ज्याच्या जोरावर भारत इंग्लंडला या सामन्यात पराभूत करू शकतो. काय आहेत ते पाच फॅक्टस जाणून घेऊया.

कोहली आणि सूर्या फॉर्ममध्ये

भारतीय संघात सध्या विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव हे बॅट्समन फॉर्ममध्ये आहेत. या वर्ल्ड कपमध्ये कोहलीने सर्वाधिक 246 धावा केल्या आहेत. तर सर्वाधिक धावांच्या यादीत सूर्यकुमार तिसऱ्या स्थानी आहे, त्याने 225 धावा केल्या आहेत. दोघांनी या स्पर्धेत प्रत्येकी तीन अर्धशतके झळकावली आहेत. जर या दोघांची बॅट चालली तर इंग्लंडला भारत एकतर्फी हरवू शकतो. कर्णधार रोहित शर्मा सध्या फॉर्ममध्ये नाही. त्याला या सामन्यात सुर गवसला तर भारतासाठी दुधात साखर अशी स्थिती असेल.

पॉवल प्ले मधील गेम

भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह या भारतीय गोलंदाजांनी पॉवर प्ले मध्ये उत्तम कामगिरी बजावली आहे. त्यांनी पॉवर प्लेमध्ये पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका या संघांना गुडघे टेकायला लावले. इंग्लंडविरोधातही असे घडले तर विजय सोपा असेल.

स्पिनर्सचा दबाव

अॅडलेड ओव्हल मैदानावर हा सामना खेळला जाणार आहे. येथे स्पिनर्स गोलंदाजांची मदत मिळू शकते. या मैदानावर टी-20 मध्ये सर्वाधिक 8 विकेट ऑस्ट्रेलियाच्या अॅडम जम्पा याने घतेल्या आहेत. या सामन्यात आर. अश्विन किंवा युजवेंद्र चहल यापैकी कुणालाही संधी मिळाली तर इंग्लंडविरोधात अक्षर पटेलसोबत मधल्या षटकांत चांगली कामगिरी बजावू शकतात.

इंग्लंडच्या टॉप 5 बॅट्समनवर नियंत्रण

जोस बटलर, अॅलेक्स हेल्स, बेन स्टोक्स, सॅम करन आणि क्रिस वोक्स हे इंग्लंडच्या संघाचा कणा मानले जातात. जर या पाच जणांवर नियंत्रण राखले तर भारतासाठी ही लढत सोपी जाईल. डेव्हिड मलान आणि मार्क वुड हे दुखापतीमुळे अंतिम अकरामध्य खेळतील की नाही याबाबत साशंकता आहे.

टाईट फील्डिंग

दक्षिण आफ्रिकेविरोधातील एक सामना सोडला तर भारतीय संघाने या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. पण, फायनलचे तिकीट मिळवायचे असेल तर भारतीय संघाला फील्डिंगमधील चांगली कामगिरी कायम ठेवावी लागेल. एक रन देखील रोखावी लागेल. कॅचची संधी सोडता कामा नये. आफ्रिकेविरूद्धच्या चुका भारतीय संघाला टाळाव्या लागतील.

दरम्यान, अॅडलेड ओव्हल येथे दुपारी दीड वाजता सामन्यास सुरवात होणार आहे. सेमी फायलन जिंकणाऱ्या संघाची 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्न येथे पाकिस्तानशी अंतिम सामन्यात लढत होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यातील विपुल शिपयार्ड कंपनीवर ईडीचा छापा, 12.20 कोटींची मालमत्ता जप्त

Goa Indore Flight: खराब हवामानाचा फटका! एक तास हवेत घिरट्या घालत होतं विमान; प्रवाशांचा जीव टांगणीला

वेंगुर्लेतील खाडीत बुडालेल्या दोन तरुणांपैकी एकाला वाचवण्यात यश; शोधकार्य सुरु

Lairai jatra: लईराई देवीच्या जत्रोत्सवादरम्यान तरुणीकडून वादग्रस्त पोस्ट; भाविकांची पोलिस ठाण्यावर धडक

Goa Today's Live News: मांडवीखाडी वेंगुर्ला येथे म्हापशातील विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT