Tea Lovers  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Tea Lovers ची काळजी वाढवणारी बातमी! संध्याकाळचा चहा पिणं ठरू शकतं हानिकारक?

भारतात मोठ्या प्रमाणात चहाप्रेमीं आहेत.

दैनिक गोमन्तक

भारतातील लोकांना चहा खूप आवडतो. विशेषतः दुधाचा चहा अधिक प्रिय आहे.  शहरातील गल्लीबोळापासून गजबजलेल्या रस्त्यांपर्यंत तुम्हाला चहाची दुकाने सापडतील. लोकांना फक्त सकाळी चहा प्यायला आवडत नाही, तर ते दिवसातून अनेक वेळा चहा घेतात. सकाळ-संध्याकाळ चहाचा आस्वाद लोक जास्त घेतात, असे सर्वसाधारणपणे दिसून येते. पण अधिक प्रमाणात चहा घेणे धोकादायक ठरु शकते.

असे म्हटले जाते की संध्याकाळी चहा (Tea) प्यायल्याने शरीरावर काही हानिकारक परिणाम होतात. सुमारे 64 टक्के भारतीय लोक रोज चहा पिण्यास प्राधान्य देतात, त्यापैकी 30 टक्के लोक संध्याकाळी चहा पितात. चला जाणून घेऊया संध्याकाळी चहा पिण्याचे काय तोटे आहेत.

  • संध्याकाळी चहा पिण्याचे तोटे

वैद्यकशास्त्रानुसार चांगली झोप, चांगले यकृत, डिटॉक्स आणि पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी झोपण्याच्या 10 तास आधी कॅफिनचे सेवन टाळावे. चहामध्ये कॅफिन असते, जे हानी पोहोचवू शकते. आहारतज्ञांच्या मते चहा पिणे वाईट नाही पण भारतातील (India) लोक दुधासोबत चहा पितात, त्यामुळे चहामध्ये असलेल्या अनेक आवश्यक घटकांची शक्ती कमी होते. 

संध्याकाळी कोणी चहा प्यावे

1. नाईट शिफ्टला काम करणारे लोक.

2. ज्या लोकांना गॅस आणि ऍसिडिटी होत नाही.

3. चांगली पचन प्रक्रिया असलेले लोक.

4. ज्या लोकांना चांगली झोप येते.

5. जे दररोज वेळेवर जेवण घेतात.

6. जे लोक दिवसातून एकदाच चहा पितात. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: आर्थिक लाभाची शक्यता आहे, पण खर्चही वाढतील; घरातील पूजनात सहभागी व्हा

Asrani Death: हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं! प्रसिद्ध डायलॉग मागील आवाज कायमचा शांत झाला; अभिनेते असरानींचे निधन

स्वप्नपूर्ती! फक्त 60 रूपयांत स्टेडियममधून पाहा टीम इंडियाचा कसोटी सामना, ऑफर कधी आणि कशी मिळेल? जाणून घ्या

Ponda Accident: कारने धडक दिल्याने एका 8 वर्षांच्या मुलीचा मृत्यू

Viral Post: "विश्वचषक जिंकायचा असेल तर अजित आगरकर, गौतम गंभीरला हटवा", व्हायरल पोस्टवर नवज्योत सिंग सिद्धू संतापले

SCROLL FOR NEXT