Yuri Alemao on Women Reservation Bill Dainik Gomantak
गोवा

Women Reservation Bill: गोव्यात महिला आरक्षण लागू होण्यासाठी 2032 ची वाट पाहावी लागेल - युरी आलेमाव

विधेयक लवकरात लवकर लागू होईल अशी आशा आहे - अलेमाव

Pramod Yadav

Women Reservation Bill: गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी लोकसभेत मंजूर झालेले महिला आरक्षण विधेयक योग्य दिशेने टाकलेले एक पाऊल असल्याचे म्हटले आहे.

पण, गोव्यातील महिलांना आरक्षणाचा फायदा मिळण्यासाठी 2032 ची वाट पाहावी लागेल असेही त्यांनी म्हटले आहे. जनगणनेला उशीर झाला आहे, जनगणनेनंतरच मतदारसंघांचे नवीन सीमांकन होऊ शकते. त्यामुळे आरक्षण लागू होण्यास विलंब होईल असे त्यांनी म्हटले आहे.

'जनगणनेच्या पहिल्या अहवालानंतर नवीन सीमांकन सुरू होईल. याचा अर्थ महिला आरक्षण विधेयक 2032 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत प्रभावी होऊ शकते. जर ही प्रक्रिया लवकर पूर्ण झाली तर 2029 च्या लोकसभा निवडणुकीत आरक्षण मिळू शकते किंवा 2034 च्या निवडणुकांची वाट पहावी लागेल,' असे युरी म्हणाले.

काँग्रेसने नेहमीच महिला सक्षमीकरणला प्राधान्य दिले आहे, म्हणूनच हे विधेयक लवकरात लवकर लागू होईल अशी पक्षाला आशा आहे. असेही अलेमाव म्हणाले.

कृतीच्या मागील हेतू कृती चांगली किंवा वाईट हे ठरवत असते. भाजप सरकारने आणलेले महिला आरक्षण विधेयक लाखो भारतीय महिला, मुली आणि इतर मागासवर्गीयांच्या आशांचा विश्वासघात आहे. असा आरोप आलेमाव यांनी केलाय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT