Vegetables Price In Goa Dainik Gomantak
गोवा

Vegetables Price In Goa: चतुर्थीच्या तोंडावर भाज्‍या महागणार!

Vegetables in Goa: सध्‍या दर स्‍थिर : उत्‍सव काळात असते मोठी मागणी; डिचोली बाजारात गर्दी

दैनिक गोमन्तक

Vegetables Price In Goa: राज्याबाहेरून येणाऱ्या भाज्यांचे दर स्थिर झाले असले तरी चतुर्थीच्या तोंडावर ते कडाडण्याची शक्यता आहे. तसे संकेत येथील आठवडी बाजारातील भाजीविक्रेत्यांकडून मिळाले आहेत.

कारण कोणतेही असो, मात्र चतुर्थीच्‍या काळात भाज्यांना प्रचंड मागणी असल्याने विक्रेते या संधीचा फायदा घेण्याची शक्यता आहेच.

गणेश चतुर्थी हा राज्‍यातील सर्वांत मोठा सण. या काळात भाज्यांना प्रचंड मागणी असते. साहजिकच भाज्यांचे दर वाढू शकतात, असा अंदाज भाजीविक्रेते रमेश रेड्डी यांनी व्यक्त केला.

दरम्यान, सध्या भाज्या स्वस्त झाल्याने महागाईने त्रस्त झालेल्या ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे.

भाज्या झाल्या स्वस्त

गेल्या महिन्यापासून डिचोलीत कर्नाटक राज्यातून येणाऱ्या भाज्यांची आवक वाढत आहे. आज बुधवारी आठवडी बाजारात तर डिचोलीत प्रचंड प्रमाणात भाज्यांची आवक झाली होती. त्‍यामुळे दरही खाली आले होते.

आज कांदे ३० ते ४० रुपये किलो, टोमॅटो २० ते ३० रुपये तर बटाटे ३० रुपये किलो या दराने विकण्यात येत होते. ६० ते ८० रुपये किलो वालपापडी आणि चिटकीमिटकीचे दर होते. अन्य भाज्याही स्वस्त झाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Baba Vanga Predictions: 2026 मध्ये 'या' 5 राशीचे लोक होणार मालामाल, बाबा वेंगांची 'अफाट धनलाभा'ची भविष्यवाणी; शनिदेवाची राहणार कृपा!

IFFIESTA: संगीतप्रेमींनो, IFFI घेऊन आलंय 3 धमाकेदार कॉन्सर्ट्स पूर्णपणे मोफत; कधी आणि कुठे? सविस्तर माहिती येथे!

Royal Enfield Bullet: रॉयल एनफील्डचा नवा धमाका! रेट्रो डिझाईन आणि आधुनिक फीचर्सची कॉम्बो 'बुलेट 650'; गोव्यातील मोटोव्हर्स फेस्टिव्हलमध्ये सादर

St. Xavier Novena: गोंयच्या सायबाचा नोव्हेना होणार सुरु! जुन्या गोव्यात भाविकांची मांदियाळी; वाचा सविस्तर माहिती

Goa Politics: "पक्षांतरबंदी हेच माझं उत्तर..." असं का म्हणाले विजय सरदेसाई? 2027 पर्यंत काँग्रेस आघाडीसोबत राहण्याचं केलं स्पष्ट

SCROLL FOR NEXT