Start rice harvest happy satisfactory farmer dainik gomantak
गोवा

Goa News : सत्तरीत भातकापणीला प्रारंभ

समाधानकारक पीक आल्याने बळीराजा सुखावला

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई : सत्तरी तालुक्यातील वेगवेगळ्या भागांत सध्या भात पिकाची कापणी आणि मळणीची कामे जोरात सुरू असून यंदा समाधानकारक पीक मिळाल्याने बळीराजा सुखावला आहे. मात्र, यंदा संततधार पावसामुळे काही प्रमाणात भाताला कीड लागली होती.

वाळपई येथील शेतकरी तथा माजी आमदार नरहरी हळदणकर यांनी पारंपरिक शेती जोपासली असून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे पुत्र शेतीकामात वावरत आहेत. गेल्या सहा दिवसांपासून वेळूस येथील त्यांच्या शेतजमिनीत भात कापणीला सुरुवात झाली आहे. यावेळी तुकाराम हळदणकर म्हणाले, दिवसेंदिवस वाढणारी महागाई तसेच शेतमजुरांचे वेतन शेतकऱ्यांना परवडत नाही. मात्र, भात शेती करून केलेल्या कामाचे समाधान मिळते. पूर्वजांचा वारसा आम्ही जपला आहे.

मशीनरीचा अभाव :

सरकारच्या कृषी खात्यातर्फे जर भात कापणीवेळी मशीन मिळाले असते तर काही प्रमाणात फायद्याचे झाले असते. कारण मशीनव्दारे एका दिवसाच्या आत भात पिकाची कापणी करता येते. मात्र, मशीन नसल्याने एक दिवसाच्या कामाला सहा दिवस लागले. त्यामुळे त्या कामगारांवर जास्त पैसे खर्च करावे लागले. कृषी खात्याने शेतकऱ्यांना भात कापणीचे मशीन उपलब्ध करावे, अशी मागणी तुकाराम हळदणकर यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT