पणजी, गोव्यात समाज नावाची चीजच अस्तित्वात नाही. गतिमानता आणि संवेदना हरवलेला समूह कधीही समाज बनू शकत नाही.
त्यामुळे गोव्यात राजाराम पैंगीणकर यांच्यानंतर एकही सामाजिक चळवळ उभी राहू शकलेली नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक रमेश गावस यांनी येथे केले.
''क्रांतिसूर्य'' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात गावस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लेखक गुरुदास रेडकर, प्रमुख वक्ते प्रभाकर ढगे, प्रकाशक शिवाजी शिंदे व कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी उपसभापती शंभू भाऊ बांदेकर उपस्थित होते.
''क्रांतिसूर्य'' हे पुस्तक गोव्यातील पांढरपेशी आयुष्य जगणाऱ्या आणि शोषित समुहातून आलेल्या सर्वांना आत्मचिंतन करायला लावणारे आहे. सरकारी नोकरीत राहूनही सामाजिक बांधिलकी कशी जोपासता येते, हे लेखकाने स्वतःच्या अनुभवातून सांगितले आहे, असे प्रभाकर ढगे म्हणाले.
लेखक गुरुदास रेडकर यांनी मध्यमवर्गीय दलित समाजाला जागे करण्यासाठी हे लेखन केले आहे. आपले समाजाप्रती असलेले कर्तव्य आणि आणि जबाबदाऱ्या विसरणाऱ्यांना लेखकाने कडक शब्दात जाब विचारला आहे, असे शंभू भाऊ बांदेकर म्हणाले.
प्रकाशक शिवाजी शिंदे व लेखक गुरुदास रेडकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. चंद्रिका पाडगावकर यांनी सूत्रसंचालन केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.