Students writing exam  Dainik Gomantak
गोवा

बारावीत एका गुणाने नापास झालेल्यांचा फेरविचार करा; पालकांची विनंती

एखाद्या विषयामध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना सूट गुण देण्याची तरतूद आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शालान्त मंडळाचा बारावीच्या परीक्षेचा काही दिवसापूर्वी निकाल जाहीर झाला. निकाल सर्वाधिक लागल्याने पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या वाट्याला आनंदाचे क्षण. पण, केवळ एका गुणाने नापास झालेल्यांची मात्र घोर निराशा झाल्याने मंडळाने फेरविचार करावा, अशी विनंती पालकांनी केली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, वारंवार मंडळाच्या पध्दतीमध्ये होणारा बदल ज्या होणाऱ्या बदलांची इत्यंभूत माहिती संबंधित विषयांचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना किंवा शाळाप्रमुखांनाही काहीवेळा नसते. बारावीच्या विज्ञान शाखेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना खास करून प्रॅक्टीकल असलेले विषय म्हणजे भौतिकशास्त्र (physics), रसायनशास्त्र (Chemistry), व जीवशास्त्रमध्ये (biology), थिअरी व प्रॅक्टीकलमध्ये वैयक्तिक स्‍वरुपात आवश्‍यक ते गुण मिळाल्यास विद्यार्थी पास होणार. सध्याच्या परिस्थितीनुसार सर्वसाधारणपणे विद्यार्थ्याला सरसकट विषयानुरुप 21 टक्के गुण मिळाले पाहिजे. या विषयामध्ये 70 गुणांच्या परीक्षेत पास होण्यासाठी 21 टक्क्यांप्रमाणे 15 गुण प्राप्त झाले पाहिजे.

पण अंतर्गत मूल्यांकनाचे 10 पैकी पाच गुण मिळून बेरीज केल्यास एकूण 19 गुण होतात. पण, तो विद्यार्थी पास होत नाही. केवळ एक गुण कमी पडल्याने तो नापास झालेला आहे. कारण गुण कंबाईन्ड जमेस धरलेले नाही. मुलांनी अंतर्गत परीक्षा दिल्या होत्या त्यानुसार ते अंतर्गत मूल्यांकन (Internal Marks) मंडळाला शाळेकडून डिसेंबर महिन्यामध्येच पाठवलेले असतात. त्या अंतर्गत मूल्यांकन गुणांचा मंडळाने विचार करावा, असे पालकांनी सांगितले.

एका गुणांसाठी नापास झालेल्या विद्यार्थ्यांना बारावीची परीक्षा पास होण्यासाठी नापास झालेल्या विषयात पुनः मूल्यांकनासाठी अर्ज करावा लागेल. त्यासाठी परत मंडळाचा परीक्षा शुल्क भरावा लागेल. त्यासाठी यंदा प्रथम सत्र परीक्षा ही objective पध्दतीची 40 गुणांची किंवा 30 गुणांची होती. तर द्वितीय सत्र Subjective पध्दतीची होती. प्रत्येक विषयाची वेळ ही दीड तासाची होती. यामुळे संबंधित तीन तासांच्या सलग दोन परीक्षा द्याव्या लागतील.

एखाद्या विषयामध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना सूट गुण देण्याची तरतूद आहे. या सुविधेचा लाभ या नापास झालेल्या विद्यार्थ्यांना लाभ होत नाही का? दुसऱ्या बाजूने एखादा विद्यार्थी जर क्रीडापटू असेल तर त्याला केवळ थिअरी परीक्षेमध्ये 11 टक्के गुण प्राप्त केल्यास उर्वरीत क्रीडा गुणांच्या आधारावर संबंधित विद्यार्थी पास होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचे धोरण मंडळाचे असताना केवळ विज्ञान शाखेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाट्याला हा प्रकार कशासाठी? केवळ एका गुणासाठी त्यांना जीवनातील महत्त्वाचे वर्ष वाया घालवावे लागते. याबाबत संबंधित विषयांचे अध्यापन करणारा शिक्षकवर्ग ही सध्या संभ्रमात आहे ?संबंधित शाळा प्रमुखांनी याबाबत शालान्त मंडळाकडे संपर्क साधून चौकशी करून अन्याय दूर करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे पालकांनी मत व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT