पणजी: येथील मासळी मार्केटमधील जुनी इमारत हटविल्यानंतर तेथे व्यवसाय करणाऱ्या मांसविक्रेत्यांच्या निर्माण झालेल्या स्थलांतराच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने निवाडा देताना त्यांना दिलासा दिला होता. मात्र एक महिना उलटला तरी त्यांचे स्थलांतर करण्याबाबत महानगरपालिका फारशी आग्रही असल्याचे दिसत नाही.
तर, दुसऱ्या बाजूने इमारत पाडल्यापासून सहा महिने मांसविक्रेत्यांच्या दुकानांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विनाकाम वेतन द्यावे लागत आहे.
येथील कुरेशी मीट ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष मन्ना बेपारी यांनी ‘गोमन्तक''ला सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने आमच्या सहा विक्रेत्यांचे स्थलांतर करण्याचा आदेश मनपाला दिल्यानंतर आम्हाला दुकाने थाटण्याची व्यवस्था करणे आवश्यक होते. परंतु आता एक महिना झाला तरी मनपाने त्याबाबत विचार केलेला नाही.
मांसविक्रेत्यांचा व्यवसाय गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यांचे कामगार दुसरीकडे कामाला गेल्यास पुन्हा येणार नाहीत. यासाठी त्यांना विनाकाम वेतन द्यावे लागत आहे. मनपाने लवकरात लवकर आम्हाला व्यवसाय करण्याची सोय करून द्यावी. दुकाने बंद राहिल्याने आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.