benaulim water supplies problems
benaulim water supplies problems Dainik Gomantak
गोवा

Benaulim : पेडा वार्का येथील पाणी प्रश्न सोडवणार; आमदार व्हीएगस यांचे संतप्त नागरिकांना आश्वासन

Rajat Sawant

Benaulim : बाणावलीतील पेडा वार्का येथील स्थानिक नागरिकांना गेल्या कित्येक दिवसांपासून पाणीपुरवठ्याची समस्या भेडसावत आहे. नागरिकांना कधी रात्री 1 ते 2 तास पाणी मिळते तर कधी खूप संथ गतीने पाणीपुरवठा होतो.

हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू आहे. नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत याबाबतची लेखी तक्रार बाणावलीचे आमदार वेन्झी व्हीएगस यांच्याकडे केली.

याबाबतची तक्रार नागरिकांनी केल्यानंतर आमदार व्हीएगस यांनी पेडा वार्का येथे जात त्या भागातील पाणीपुरवठ्याच्या अधिकाऱ्यांसमवेत पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची पाहणी केली. येथील स्थानिकांचा पाणीप्रश्न सोडवण्याची जवाबदारी मी घेतो. नागरिकांना लवकरच सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

यावेळी आमदार व्हीएगस म्हणाले, या मतदारसंघात पाणीप्रश्नच्या समस्या निवडणुकीपूर्वी पासून भेडसावत आहेत. निवडणुकीपूर्वी मी 'उदकाची सुटका' ही मोहीम चालू केली होती आणि आता पाण्याचा मुक्त प्रवाह करण्याची वेळ आली आहे असे आमदार व्हीएगस यांनी सांगितले.

मुख्य समस्या म्हणजे, आमच्या पाईपलाईन खूप जुन्या आहेत. माजी क्रीडामंत्री व बाणावलीचे माजी आमदार फ्रांसिस्को मॉंत क्रुझ यांच्या कार्यकाळात पाईपलाईन टाकल्या गेल्या होत्या. त्या खूप पूर्वीच बदलायला हव्या होत्या, मी पाईपलाईन बदलण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT