पणजी: शिरगाव गावातील शेतजमिनी व ओढ्यांमधील खनिजमाती गाळ काढण्यासाठी आलेला खर्च संबंधित खाण कंपन्यांनीच करावा यासंदर्भात सरकारने जारी केलेल्या आदेशाला खाण कंपन्यांनी आव्हान दिले होते त्यावरील सुनावणी पूर्ण होऊन आदेश येत्या मंगळवारी (२८ जानेवारी) ठेवला आहे.
शिरगाव गावात खाण कंपन्यामुळे तेथील शेजमिनी तसेच ओढ्यांमध्ये खनिजमाती गाळ जाऊन पडिक झाल्या होत्या. त्यामुळे हा गाळ उपसण्यासंदर्भात तसेच नुकसान भरपाईसंदर्भात उच्च न्यायालयाने निवाडा दिला होता.
गोवा खंडपीठाने हा खनिजमातीचा गाळ उपसण्यासाठी येणारा खर्च करण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी तो केला नाही. सरकारने हा गाळ खासगी एजन्सीमार्फत उपसला होता. त्यासाठी आलेल्या खर्चाची अर्धी रक्कम सरकारने सोसली होती.
उर्वरित अर्धी रक्कम खान कंपन्यांनी जमा केलेल्या डिस्ट्रिक्ट मिनरल फंडातून (डीएमएफ) खर्च करण्याची विनंती केली होती. सरकारने हा खर्च खाण कंपन्यांनीच करावा यासंदर्भातचा आदेश जारी केला होता त्याला विरोध करणारा अर्ज शिरगावमधील तीन खाण कंपन्यांनी केला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.