Margao Palika Dainik Gomantak
गोवा

Margao Palika : मडगाव पालिकेच्या मुख्याधिकारी चेंबरमधून सीसीटीव्ही का हटविले?

कर्मचारी वेळेवर येतात, वेळेवर जातात तसेच कर्मचारी खरोखरच काम करतात की नाही हे पाहण्यासाठी हे कॅमेरे बसवले

गोमन्तक डिजिटल टीम

Madgao Palika : मडगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर यांच्या चेंबरमधील सीसीटीव्ही हटविल्याने नगरसेवक महेश आमोणकर यांनी आश्र्चर्य व्यक्त केले आहे. नगरपालिकेच्या सर्वच विभागांसह नगराध्यक्ष व मुख्याधिकारी चेंबरमध्ये सीसीटीव्ही लावले होते.

गत साली लिंडन परेरा नगराध्यक्ष असताना पालिकेत सीसीटीव्ही बसविले होते. गेल्या काही काळापासून मुख्याधिकारी चेंबरमधील सीसीटीव्ही कॅमेरा कार्यरत नव्हता म्हणून तो काढण्यात आला. जर वरिष्ठ अधिकारी त्यांच्या स्तरावर शिस्त पाळत नसतील तर पालिकेतील सर्व सीसीटीव्ही काढूनच टाकावे, असे आमोणकर म्हणाले.

काही कर्मचाऱ्यांनीही प्रश्र्न उपस्थित केला आहे की त्यांच्यावरच रोष का? नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या चेंबरमध्ये काय चालले आहे याचे रिकोर्डिंग केले पाहिजे व लक्षही ठेवले पाहिजे. नगरपालिकेने २.५ लाख रुपये खर्चून ३२ सीसीटीव्ही कॅमेरे घेतले होते. कर्मचारी वेळेवर येतात, वेळेवर जातात तसेच कर्मचारी खरोखरच काम करतात की नाही हे पाहण्यासाठी हे कॅमेरे बसवले आहेत.

महेश आमोणकर, नगरसेवक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT