Joshua D'Souza Dainik Gomantak
गोवा

Joshua D'Souza : पाच वर्षांत म्हापशाचा करणार कायापालट

विरोधकांना बोलण्याची संधी देणार नाही

दैनिक गोमन्तक

म्हापसा : येथील मतदारसंघात अपेक्षित विकास झाला नाही, असे हिणवले जाते. मात्र, येत्या पाच वर्षांत म्हापसा शहराचा कायापालट होईल व विरोधकांना बोलण्याची एकही संधी राहणार नाही, असे सांगत उपसभापती तथा आमदार ज्योशुआ डिसोझा यांनी आपल्या कार्यकाळात रवींद्र भवनाचा प्रश्न मार्गी लावणार, अशी ग्वाही त्यांनी दिली.

बुधवारी सायंकाळी उशिरा म्हापसा येथील उत्तर गोवा भाजपा जिल्हा कार्यालयात म्हापसा भाजपा मंडळातर्फे जोशुआ यांची उपसभापती निवड झाल्याबद्दल त्यांचा भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर, सुशांत हरलमकर, रुपेश कामत, श्रीकृष्ण पोकळे, राजसिंह राणे आदी मान्यवर उपस्थित होते.

उपसभापती जोशुआ डिसोझा म्हणाले, नुकतेच आम्ही तार पुलाचे लोकार्पण केले असून हे काम करताना तेथील एकाही बांधकामास हात लावला नाही. तसेच आंतराराज्य नवीन बसस्थानक कार्यान्वित केले. सध्या भूमिगत विद्युत वाहिन्यांचे काम सुरू आहे. त्याशिवाय या पाच वर्षांत रवींद्र भवनाचा प्रश्न मार्गी लावला जाईल. म्हापशात किंवा शहराच्या सीमेवर या भवनाची पायाभरणी करणार, असे ठोस आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: 2026 मध्ये 'या' 5 राशी होणार कर्जमुक्त; कोणाला मिळणार कुबेराचा खजिना आणि कोणाच्या खिशाला लागणार कात्री?

Vijay Hazare Trophy: अर्जुन तेंडुलकरला धु धु धुतलं! मुंबईच्या फलंदाजांनी गोव्याच्या गोलंदाजीचा घेतला समाचार; सर्फराज-यशस्वीची धमाकेदार फलंदाजी VIDEO

Goa Tourism: ''आपुलकीने स्वागत करा'', पर्यटनाचा वेग वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा 'मंत्र'

Arpora Nightclub Fire: हडफडे दुर्घटनाप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे 2 बडे अधिकारी निलंबित; दोषींना सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांनी दिला इशारा

PM मोदींचा संदेश घेऊन जयशंकर पोहोचले बांगलादेशला, तणावाच्या वातावरणात भारताचे महत्त्वाचे पाऊल; खालिदा झियांच्या लेकाला सोपवली चिठ्ठी

SCROLL FOR NEXT