डीचोली: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी साखळी येथे दिलेल्या भेटीचा भाजपच्या मतदारसंघातील मतांच्या वाटाबाबत परिणाम होणार नाही. असे विधान करत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.(Manmohan Singh's visit benefited the BJP says cm pramod sawant)
मतदारसंघातील गांधींच्या सभेचा भाजपवर 1% सुद्धा परिणाम होणार नाही, असे सावंत यांनी रविवारी साखळी (Sanqulim) शहरातील रोड शो दरम्यान एका सभेत सांगितले. ते पुढे म्हणाले, राज्याचा सर्वांगीण विकास केवळ भाजपच करू शकतो, हे लक्षात आल्यानंतर अधिकाधिक लोक भाजपमध्ये येऊ लागले आहेत. तसेच 2012 च्या निवडणुकीच्या वेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांनी देखील साखळीला भेट दिली होती, परंतु भाजपच्या मतांवर परिणाम झाला नाही, उलट भाजपने (Goa BJP) मोठ्या फरकाने जागा जिंकली. यावेळी संपूर्ण सिद्धिविनायक मंदिर समितीने भाजपमध्ये प्रवेश केला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.