Goa Womens Commission receives 3 to 4 complaints per day
Goa Womens Commission receives 3 to 4 complaints per day 
गोवा

गोवा महिला आयोगाककडे येतात दिवसाला ३ ते ४ तक्रारी

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्याच्या महिला आयोगाकडे दिवसाला सरासरी तीन ते चार तक्रारी येत आहेत आणि आम्ही या तक्रारी सोडविण्याचा प्रयत्न करीत आहोत. अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी अनेक महिलांच्या तक्रारी प्रलंबित होत्या. या तक्रारीसुद्धा आम्ही सोडवत आणल्या असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विद्या गावडे यांनी दिली. 


टाळेबंदीच्या काळात आयोगाकडे खूप कमी तक्रारींची नोंद झाली होती. मात्र, आता महिला पुढे येत आहेत. ज्या महिला तक्रारी करण्यासाठी येत आहेत, त्यांच्यामध्ये विवाहित महिलांचे प्रमाण जास्त आहे. अविवाहीत तसेच कॉलेजला जाणाऱ्या महिलांच्या याबाबतीत आता महाविद्यालयीन जीवन ऑनलाईन पद्धतीने सुरू असल्याने छेडछाडीच्या तक्रारी खूप कमी प्रमाणात समोर येत असल्याचेसुद्धा यावेळी त्यांनी सांगितले. 


सध्या आयोगाकडे येणाऱ्या प्रत्येक समस्येच्या बाबतीत आम्ही ४ ते ५ वेळा लोकांना भेटत आहोत आणि प्रकरणे सोडवत आहोत. कधीकधी महिलेच्या घरातील वातावरण पाहण्यासाठी आम्हाला भेटसुद्धा द्यावी लागते. सायबर क्राईमच्या तक्रारींच्या बाबतीतसुद्धा ठोस काम करण्याचा आमचा प्रयत्न सुरू असल्याचे त्या म्हणाल्या. 


राज्यातील महिलांबाबतचे आणि कायदे आणि आयोगाची नियमावली मराठी आणि कोंकणीमध्ये महिलांच्या हाती देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, यासाठीचे कामसुद्धा सुरू असल्याचे त्या म्हणाल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT