राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्यानं बदल पाहायला मिळत आहेत. यामुळे गोमंतकीय नागरिकांसोबतच शेतकरी, बागायतदार, आणि सामान्य लोक चिंतेत आहेत. हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, सत्तरी आणि धारबांदोडा तालुक्यात येत्या तीन तासांत गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामानातील या अस्थिरतेमुळे शेतकरी आणि बागायतदारांची चिंता वाढली आहे, कारण फळबागांवर या पावसाचा मोठा परिणाम होऊ शकतो.
सततच्या वातावरणातील बदलांमुळे गोमंतकीय नागरिक हैराण झाले आहेत. कधी कडक ऊन, तर कधी गडगडाटासह पावसाची हजेरी लागते. या अस्थिर हवामानामुळे सामान्य जनजीवनही प्रभावित होत आहे.
राज्यातील आंबा आणि काजू बागायतदारांसाठी या अस्थिर हवामानामुळे धोक्याची घंटा आहे. मार्च ते मे हा कालावधी आंबा आणि काजूच्या उत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या काळात बागायतदारांची मेहनत सर्वाधिक असते.
मात्र, सततच्या हवामानातील बदलांमुळे बागांवर पाणी, गडगडाट आणि जोरदार पाऊस यांचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.