Goa CM Pramod Sawant News Dainik Gomantak
गोवा

निवडणुकीसाठी 12 सप्टेंबरपर्यंत वेळ द्या

सरकारची न्यायालयाला विनंती; याचिकेवर सुनावणी पूर्ण, निकाल राखीव

आदित्य जोशी

पणजी : 186 पंचायतीच्या निवडणुकांची अधिसूचना तीन दिवसात जारी काढून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 15 दिवसात पूर्ण करावी असा आदेश गोवा खंडपीठाने मंगळवारी दिला होता. यावर पावसाळा व विधानसभा अधिवेशनाचे कारण देऊन सरकारने निवडणुकांसाठी आणखीन एक महिन्याचा म्हणजे 12 सप्टेंबरपर्यंत वेळ द्यावा अशी विनंती करणारी याचिका न्यायालयात सादर केली होती. यावर सुनावणी पूर्ण झाली असून निकाल राखीव ठेवण्यात आला आहे.

186 पंचायतींच्या निवडणुका घ्यायचे असतील तर इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षण लागू करताना त्रिसूत्री लागू करावी असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 10 मे ला दिल्याने सरकारपुढे पेच निर्माण झाला होता. याविरोधात सुकुर पंचायतीचे संदीप वजरकर न्यायालयात गेले होते तर याच याचिकेमध्ये सामाजिक कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनीही हस्तक्षेत याचिका दाखल केली. यावर न्यायालयाने तीन दिवसात अधिसूचना काढण्याचा निकाल देवून सरकारला दणका दिला होता.

राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय पावसाळी अधिवेशन 12 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान होत आहे. या दरम्यान पंचायत निवडणुका घेणे तांत्रिकदृष्ट्या अवघड बनणार आहे. त्यामुळे आम्ही सरकारच्या वतीने निवडणुका घेण्यासाठी आणखीन एक महिन्याची म्हणजे 12 सप्टेंबर ची मुदत द्यावी अशी मागणी केली आहे. यावर निकाल राखीव ठेवण्यात आला आहे, अशी माहिती ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी दिली.

दुसरीकडे सरकारला निवडणुका पुढे ढकलण्यासाठी कारण हवे आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत या निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ नयेत. यासाठीच आम्ही संदीप वजरकर यांच्या याचिकेमध्ये राज्यातल्या सर्व पंचायतींच्या मार्फत हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. आम्हाला अपेक्षा आहे, पंचायतींच्या निवडणुका तातडीने होतील. सध्या सुनावणी पूर्ण झाली असून निकाल राखीव ठेवण्यात आला आहे, असं याचिकादार सुदीप ताम्हणकर यांचं म्हणणं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

SCROLL FOR NEXT