CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील प्रत्येक घरी तिरंगा फडकवण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन

दैनिक गोमन्तक

पणजी : 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लोकांना 'हर घर तिरंगा' मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच 13 ते 16 ऑगस्ट पर्यंत घरोघरी राष्ट्रध्वज फडकावावा असे ही आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. पणजी येथील शासकीय निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Goa CM Pramod Sawant urges goans to hoist National Flag under har ghar tiranga )

यावेळी बोलताना डॉ. सावंत यांनी माध्यमांना संबोधित करताना सांगितले, “मी गोवावासियांना 2 ऑगस्टपासून सोशल मीडियावर राष्ट्रध्वज त्यांच्या प्रदर्शनाचे चित्र म्हणून ठेवण्याचे आवाहन करतो.” यात आपण सहभागी व्हाल याची मला खात्री आहे , असे ही ते यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना सावंत म्हणाले की, गोव्यात आझादी का अमृत महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे. "आझादी का अमृत महोत्सवासाठी विविध कार्यक्रमांवर निर्णय घेण्यासाठी पंतप्रधान भवन येथे बैठकांचे आयोजन करणार आहेत. तसेच गोवा मुक्तीसाठी बलिदान दिलेल्या 71 स्वातंत्र्यसैनिकांना 15 ऑगस्ट रोजी सन्मानपत्र देण्यात येणार असल्याची माहिती सावंत यांनी दिली.

तसेच गोव्यातील हस्तकलेतून एक लाख ध्वज बनवणार आहेत. तसेच उद्या दिनांक 3 ऑगस्ट पासून गोव्यातील स्टेशनरीच्या दुकानात आणि इतर दुकानांमध्ये ध्वज उपलब्ध होतील. असे असले तरी हाताने बनवलेल्या ध्वजांच्या व्यतिरिक्त मशीन-निर्मित ध्वजांना परवानगी आहे. असे ही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

फडकवलेला ध्वजा संध्याकाळी 6 वाजता खाली घेण्याची गरज नाही

तसेच ध्वजा रोहन केलेल्यानंतर नागरिकांनी फडकवलेला ध्वजा संध्याकाळी 6 वाजता खाली घेण्याची गरज नाही. कारण सरकारच्या पूर्वीच्या आदेशानुसार केंद्र सरकारने संपूर्ण कालावधीत झेंडे फडकावण्याची परवानगी दिली आहे. आणि संध्याकाळी 6 वाजताचे कलम काढून टाकले आहे," गोव्याचे मुख्यमंत्री म्हणाले.उल्लेखनीय म्हणजे, आझादी का अमृत महोत्सव हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 मार्च रोजी भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 गौरवशाली वर्षांच्या स्मरणार्थ सुरू केला होता.

28 राज्ये, 8 केंद्रशासित प्रदेश आणि 150 हून अधिक देशांमध्ये 50,000 हून अधिक कार्यक्रम यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आले असून, आझादी का अमृत महोत्सव हा उपक्रम व्याप्ती आणि सहभागाच्या दृष्टीने आयोजित केलेला सर्वात मोठा कार्यक्रम आहे.नागरिक, खाजगी संस्था किंवा शैक्षणिक संस्था सर्व दिवस आणि प्रसंगी राष्ट्रध्वज फडकावू शकतात किंवा प्रदर्शित करू शकतात. ध्वज प्रदर्शनाच्या वेळेवर कोणतेही बंधन नाही.

भारताच्या ध्वज संहितेत यापूर्वी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सुधारणा करण्यात आली होती ज्यामध्ये कापूस, लोकर, रेशीम आणि खादी व्यतिरिक्त हाताने कातलेले, हाताने विणलेले आणि मशीनने बनवलेले ध्वज बनवण्यासाठी पॉलिस्टर वापरण्याची परवानगी दिली होती.

सरकारने भारतीय ध्वज संहितेत बदल केला आहे. ज्यामुळे तिरंगा उघड्यावर आणि वैयक्तिक घरांवर किंवा इमारतींवर दिवस आणि रात्र प्रदर्शित करता येईल. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले की, 'हर घर तिरंगा' आंदोलन 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान केले जाईल आणि देशातील नागरिकांना 2 ऑगस्ट ते ऑगस्ट दरम्यान सोशल मीडिया अकाउंटवर 'तिरंगा' प्रोफाइल पिक्चर म्हणून वापरण्याचे आवाहन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT