Goa CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly 2025: गोवा सरकारचा स्तुत्य निर्णय, आता शालेय जीवनातच मिळणार शेतीचे धडे; आठवी ते दहावीच्या अभ्यासक्रमात बदल

CM Pramod Sawant: गोवा विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, 8वी ते 10वीच्या शालेय अभ्यासक्रमात कृषी विषय समाविष्ट करण्यात आला आहे.

Manish Jadhav

पणजी: राज्यात कृषी क्षेत्राकडे युवा पिढीला आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला. गोवा विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, 8वी ते 10वीच्या शालेय अभ्यासक्रमात कृषी विषय समाविष्ट करण्यात आला आहे. तसेच, 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणासोबतच प्रत्यक्ष शेतीत (Practical Exposure) नेण्यात येईल, जेणेकरुन त्यांना व्यावहारिक अनुभव मिळेल.

शालेय शिक्षणात कृषी विषय का?

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आमदार अलेक्सो रेजिनाल्ड लॉरेन्सो (Aleixo Reginald Lourenco) यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. या निर्णयामागचे उद्दिष्ट स्पष्ट करताना मुख्यमंत्री म्हणाले की, विद्यार्थ्यांना लहान वयातच कृषी (Agriculture) क्षेत्राचे महत्त्व आणि तंत्रज्ञान (Technology) समजावे, जेणेकरुन भविष्यात ते या क्षेत्राकडे एक उत्तम करिअर पर्याय म्हणून पाहू शकतील.

  1. अभ्यासक्रमात समावेश: 8वी, 9वी आणि 10वीच्या अभ्यासक्रमात कृषी हा विषय शिकवला जाईल.

  2. व्यावहारिक शिक्षण: 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना शेतीचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी त्यांना शेतात नेण्यात येईल.

कृषी महाविद्यालय आणि अभ्यासक्रम

सरकारने कृषी शिक्षणाला अधिक महत्त्व दिले आहे.

  • कृषी महाविद्यालय: दोन वर्षांपूर्वीच जुने गोवे (Old Goa) येथे कृषी महाविद्यालय (Agriculture College) सुरु करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळत आहे.

ॲग्रो-क्लिनिक कोर्स: लवकरच साखळी येथे ॲग्रो-क्लिनिक (Agro-clinic) कोर्स सुरु करण्यात येणार आहे. यामुळे कृषी क्षेत्रातील तज्ञ तयार होतील, जे शेतकऱ्यांना मदत करतील.

कृषी संशोधन आणि पुढील पावले

मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, कृषी शिक्षणासोबतच कृषी संशोधन (Agricultural Research) देखील सुरु आहे. यामुळे गोव्यातील जमिनीला आणि हवामानाला (Climate) अनुकूल अशा नवीन पिकांच्या जाती आणि तंत्रज्ञान शोधण्यास मदत होईल.

या सर्व उपाययोजनांमुळे गोव्यातील (Goa) तरुण पिढी कृषी क्षेत्राला एक सन्मानजनक आणि फायदेशीर करिअर पर्याय म्हणून पाहू लागेल, अशी सरकारला आशा आहे. तसेच, यामुळे राज्यातील कृषी उत्पादन (Agricultural Production) वाढण्यासही मदत होईल.

आमदार रेजिनाल्ड यांचा दावा: पालकांची मानसिकता नाही!

सरकारच्या या निर्णयावर आमदार अलेक्सो रेजिनाल्ड यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, "शिक्षणात कृषी विषयाचा समावेश करणे चांगली गोष्ट आहे, पण विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचीही मुलांना शेतीत पाठवण्याची मानसिकता नाहीये." रेजिनाल्ड यांच्या म्हणण्यानुसार, ग्रामीण भागातही शेतीत काम करण्याऐवजी सरकारी नोकरीला (Government Job) प्राधान्य दिले जाते. त्यामुळे केवळ अभ्यासक्रमात बदल करुन चालणार नाही, तर लोकांची मानसिकता बदलण्यासाठीही ठोस पावले उचलावी लागतील.

यावर मुख्यमंत्र्यांनी शिक्षणासोबतच कृषी उत्पादन वाढवून आणि शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आणून लोकांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT