Goa Accident News Dainik Gomantak
गोवा

Sanquelim : दुचाकीवरुन निघालेल्या दाम्पत्याचा अपघातात दुर्देवी अंत; 1 वर्षाच्या चिमुरड्याचा हात फ्रॅक्चर

हरवळे साखळी झाला भीषण अपघात

Rajat Sawant

Goa Accident News: हरवळे साखळी येथे एक भीषण अपघात घडला आहे. हा अपघात दुचाकी आणि ट्रक यांच्यात आज दुपारी झाला. अपघातात दुचाकीवरील दाम्पत्याचा जागीच मृत्यु झाला असून 1 वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हरवळ्याचे किशोर नाईक आणि त्यांची पत्नी व 1 वर्षांचा मुलगा दुचाकीवरुन सत्तरी होंडाच्या दिशेने जात होते. यावेळी ते सुपाची कुड-हरवळे येथे आले असता ट्रकला ओव्हरटेक करताना हा अपघात घडला.

या अपघातात नाईक दाम्पत्याचा जागीच मृत्यु झाला तर त्यांच्या एक वर्षाच्या मुलाच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करीत आहे.

अशीच एक अपघाताची घटना मंगळवारी रात्री म्हापसा येथे घडली. या अपघातात एक युवकाचा जागीच मृत्यु झाला तर लहान मुलीसह चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी रात्री 11.30 च्या सुमारास घडला.

कळंगुट- म्हापसा मार्गावर बोडगिणी येथे रात्री 11.30 च्या सुमारास दोन दुचाकींमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात सदाम खान (रा. काणका) या तरुणाचा मृत्यू झाला तर लहान मुलीसह चार जण गंभीर जखमी झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT