House Collapsed  Dainik Gomantak
गोवा

Salcete: नुकसान भरपाईसाठी सासष्टीतून १३१ अर्ज

Government Compensation: नुकसान झालेल्‍या व्‍यक्‍तींना जिल्‍हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून कमाल दोन लाख रुपयांपर्यंत मदत दिली जात आहे

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: मागचा महिनाभर पडत असलेल्‍या जोरदार पावसामुळे सासष्‍टी तालुक्‍यात मोठ्या प्रमाणावर पडझड झाली असून या तालुक्‍यातील सुमारे १३१ घरांची पडझड झाली आहे. या घरमालकांनी सरकारकडे नुकसानभरपाईसाठी अर्ज केले आहेत.

एका मडगावातच सहा ठिकाणी घरांची पडझड होण्‍याच्‍या घटना घडल्‍या असून पावसामुळे मातीच्‍या भिंती फुगल्‍याने चार घरांच्‍या भिंती कोसळल्‍या. तर दरड कोसळल्‍याने एका इमारतीतील सहा फ्‍लॅट्‌सची हानी झाली होती. त्‍याशिवाय भिंतीवर झाडे पडून घरांची मोडतोड होण्‍याच्‍याही घटना आहेत, असे नुकसान झालेल्‍या व्‍यक्‍तींना जिल्‍हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून कमाल दोन लाख रुपयांपर्यंत मदत दिली जात आहे.

सासष्‍टी आपत्ती व्‍यवस्‍थापन यंत्रणेकडे सध्‍या सुमारे १३१ घरांच्या दुरुस्ती आणि नुकसान भरपाईसाठी अर्ज आले आहेत. यातील काही अर्ज मंजुरीसाठी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविले आहेत. सासष्‍टी मामलेदारांकडे मडगावसह, नावेली, कोलवा, असोळणा, नुवे, वेर्णा, गिरदोली, बाणावली आणि इतर गावांमधून घरदुरुस्तीचे अर्ज आले आहेत, अशी माहिती या विभागातील सूत्रांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT