Arambol Chili Farming: | Dainik Gomantak
गोवा

Arambol Chili Farming: प्रसिद्ध ‘हरमलची मिरची’ फुलतेय!

मिरची लागवड सुरू झाली मात्र अवकाळी पाऊस, धुक्‍यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

दैनिक गोमन्तक

Arambol Chili Farming: सध्या हरमलमध्‍ये शेतकरी आपल्या कसदार जमिनीत मिरची लागवडीसाठी व्यस्त आहेत. कित्येकांनी मिरची बिया टाकून लहान रोपे तयार केली आहेत व सध्या शिंपण तसेच अन्य कामे सुरू आहेत.

पुढील दहा ते पंधरा दिवसांत प्रत्यक्ष लागवड होईल अशी अपेक्षा आहे. एकंदरीत मिरची लागवडीसाठी शेतकरी मग्न व व्यस्त आहेत, मात्र अवकाळी पाऊस व धुक्‍यामुळे ते थोडेसे चिंताग्रस्त बनले आहेत.

पुढील तीन महिन्यांत मिरची विक्रीसाठी तयार असेल. सध्या मिरचीची लहान रोपे तयार असून ती लागवडीयोग्य बनली आहेत. नांगरणी, वाफे तयार करणे, माग ठेवणे तसेच कुंपण घालून (पोरसू) घट्ट करण्यात येत असल्याचे शेतकरी विष्णू नाईक यांनी सांगितले.

गेल्‍या 25 वर्षांपासून मी मिरचीचे उत्पादन घेत असून, दर हंगामात 60-70 किलो विक्री करायचो. शिवाय दहा-पंधरा किलो कुटुंबासाठी ठेवायचो. यंदाच्या हंगामात लागवडीसाठी जमीन व वाफे तयार असल्याने आवश्यक सुविधांसह लागवड केली जाईल, असेही नाईक म्‍हणाले.

कसदार जमिनीत रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होते. केवळ शेण खत व गोठ्यात तयार केलेल्या खतापासून मिरचीचे उत्पन्न घेत असल्याचे नाईक यांनी सांगितले.

अलीकडे रासायनिक खतांचा दुष्परिणाम पिकांवर होत असल्याने तसेच मिरचीचा आकार लहान होत असल्याचे दिसून आले. त्याशिवाय जमिनीतील ओलसरपणा नष्ट होत असल्याने वर्षभरात खताचा वापर केला जातो, असेही त्यांनी सांगितले.

कित्‍येकदा ग्राहकांची होते फसवणूक

‘हरमलची मिरची’ सर्वदूर प्रसिद्ध असून मोठी मागणी आहे. विशेषतः बार्देश, डिचोली व तिसवाडी भागांतील लोक पावसाळ्यपूर्वी या मिरचीची खरेदी करतात. कित्येकदा अन्य भागांतील विक्रेते ‘हरमलची मिरची’ म्हणून ग्राहकांना फसवितात.

त्यामुळे ग्राहकांनी खात्री केल्यानंतरच मिरचीची खरेदी करावी, असे आवाहन हरमलची मिरचीविक्रेती महिला सत्यवती नाईक यांनी केले.

अवकाळी पाऊस तसेच धुके यामुळे मात्र शेतकऱ्यांना चिंता लागून राहिली आहे. ऐन पिकांच्या हंगामात धुक्याची दुलई आल्यास वा पावसाने हजेरी लावल्यास तोंडचा घास हिरावला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हरमलच्या मिरचीला भौगोलिक सूची अर्थात जीआय मानांकन लाभले आहे. त्‍यामुळे येथील सुपीक, कसदार जमिनीचे महत्त्व ध्यानी आले. पूर्वी 30 ते 35 किलो उत्पादन करायचो,

मात्र मानांकन मिळाल्याने उत्पादन जास्त घेण्याचा प्रयत्न केला व यशही मिळाले. कष्ट घेण्याची तयारी असल्याने शेजारच्या व्यक्तीची जमीन भाडेपट्टीवर घेऊन उत्‍पादन घेत आहे. - विष्णू नाईक, शेतकरी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 8 April 2026: आजचा दिवस तुमच्यासाठी खास! 'या' राशींना मिळणार नवीन नोकरीची संधी; अडकलेले पैसेही परत मिळणार

भारताची अणुऊर्जेत मोठी झेप! कल्पक्कममध्ये 'फास्ट ब्रीडर रिएक्टर' यशस्वी, PM मोदींकडून अभिनंदन; होमी भाभांचे स्वप्न साकार

Supreme Court: रागाच्या भरात दिलेली शिवी गुन्हा ठरणार नाही! 'बास्टर्ड' शब्दावरुन झालेली शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने केली रद्द; नेमकं प्रकरण काय?

Cricket Record: दोन दिग्गज, एक संघ, दशकांचा काळ! 90 टेस्ट आणि 307 वनडे सामने एकत्र खेळले; पण 'या' बहाद्दरांची जोडी बॅटिंगसाठी कधीच जमली नाही

इशानचा 'ड्रग्‍स कॉकटेल' मुळेच मृत्‍यू, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा! शरीरात 5 अमलीपदार्थांचे अंश

SCROLL FOR NEXT