YS Jagan Mohan Reddy Dainik Gomantak
देश

Andhra Pradesh: जगन रेड्डी यांच्या मंत्रिमंडळाने दिला राजीनामा

आंध्र प्रदेशच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिला आहे. आता मुख्यमंत्री जगन रेड्डी नव्याने मंत्रिमंडळ स्थापन करणार आहेत.

दैनिक गोमन्तक

आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिला आहे. आता मुख्यमंत्री जगन रेड्डी नव्याने मंत्रिमंडळ स्थापन करणार आहेत. मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy) यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर पहिल्या टप्प्यात 24 मंत्र्यांनी राजीनामे सादर केले आहेत. मंत्रिमंडळात जगन रेड्डी हे एकमेव मुख्यमंत्री राहिले आहेत.

दरम्यान, मंत्रिमंडळात बदल होणारच होते, कारण मुख्यमंत्र्यांनी अर्धा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर मंत्रिमंडळ बदलणार असल्याचे यापूर्वीचं सांगण्यात आलं होतं. हा बदल डिसेंबर 2021 मध्ये होणार होता, परंतु कोरोना (Corona) संकटामुळे तो पुढे ढकलावा लागला होता. मुख्यमंत्र्यांनी बुधवारी संध्याकाळी राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन यांची भेट घेऊन मंत्रिमंडळातील बदलांची माहिती दिली.

कोरोनामुळे मंत्रिमंडळ पुनर्रचना होऊ शकली नाही

विद्यमान मंत्रिमंडळाने 8 जून 2019 रोजी शपथ घेतली होती. या कारणास्तव, ते 8 डिसेंबर 2021 पर्यंत या पदावर राहणार होते, परंतु कोरोना महामारीमुळे मंत्रिमंडळ पुनर्रचनेचा निर्णय पुढे ढकलण्यात आला. मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांना सांगण्यात आले की, आम्ही उगादी (April 2 is Telugu New Year's Day) दिनी मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. तेलुगू नववर्ष दिनानिमित्त 13 नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली आहे. नवीन जिल्ह्यांच्या समावेशानंतर आता राज्यातील एकूण जिल्ह्यांची संख्या 26 झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ट्रॅक्टरला रथासारखी चाकं... सोशल मीडियावर व्हायरल झाला भन्नाट 'जुगाड', लोक म्हणाले, "हा आहे नवा भारत"

Shubman Gill Era Begins! पहिल्याच वनडेत 'कॅप्टन कूल' धोनीचा विक्रम मोडला, केली 'ही' मोठी कामगिरी

Renuka Yellamma History: वीरशैव संप्रदायात धार्मिक उठाव झाला, सावदत्ती वैष्णव राजांच्या अधिपत्याखाली आली; यल्लम्माशी निगडित प्रथा

Betoda: बेतोड्यात आयआयटीला विरोध, सरपंचांना धरले धारेवर; ग्रामसभेत ठराव मंजूर

IND VS AUS: रोहित, विराट की आणखी कोणी? कॅप्टन शुभमन गिलनं सांगितलं पराभवाचं खरं कारण, म्हणाला...

SCROLL FOR NEXT