New Hit-and-Run Law Dainik Gomantak
देश

New Hit-and-Run Law: काय आहे नवा हिट अँड रन कायदा, वाहनधारकांना आलं टेन्शन; देशभरात पुन्हा सुरु झाली निदर्शने

What Is New Hit And Rule: फौजदारी कायद्यांना देशी रंग देणारे भारतीय न्याय संहिता विधेयक हिवाळी अधिवेशनात संसदेने मंजूर केले.

Manish Jadhav

New Hit-and-Run Law: फौजदारी कायद्यांना देशी रंग देणारे भारतीय न्याय संहिता विधेयक हिवाळी अधिवेशनात संसदेने मंजूर केले. आता काही महिन्यांत आयपीसीचे कायदे नवीन तरतुदींद्वारे बदलले जातील. दरम्यान, त्याच्या एका कायद्याबाबत देशभरात निदर्शने सुरु झाली आहेत. हिट अँड रनवर ही नवीन तरतूद करण्यात आली आहे. या अंतर्गत रस्त्यावर कोणतीही हिट अँड रनची घटना घडल्यास वाहन चालकास 10 वर्षांची शिक्षा होणार आहे. याशिवाय त्याला दंडही भरावा लागणार आहे. वास्तविक, वाहनाच्या धडकेनंतर पळून जाणे हे हिट अँड रन समजले जाते. आतापर्यंत अशा प्रकरणांमध्ये दोन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद होती आणि जामीनही मिळत होता.

आता नव्या नियमानुसार, जर कोणी वाहनाला धडक दिली आणि चालक पोलिस प्रशासनाला न सांगता घटनास्थळावरुन पळून गेला, तर त्याला 10 वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा आणि दंडही होणार आहे. या कायद्याला चुकीचे म्हणत देशभरात आंदोलने होत आहेत. हरियाणा, दिल्ली, यूपी, मध्यप्रदेश, बिहारसह अनेक राज्यांमध्ये ट्रक चालकांनी रास्ता रोको केला आहे. या कायद्यातील तरतुदी सौम्य करण्याची मागणी गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली जात आहे. या नियमामुळे केवळ ट्रकचालकच नाही तर टॅक्सी आणि ऑटोचालकही टेन्शनमध्ये आले आहेत. हा कायदा खाजगी वाहनधारकांनाही समानरित्या लागू होणार आहे.

सरकारी आकडेवारीनुसार, दरवर्षी 50 हजार लोक रस्त्यावर हिट अँड रन प्रकरणांमध्ये मरण पावतात. गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत सांगितले होते की, नवीन कायद्यात सरकार हिट अँड रन प्रकरणांमध्ये कठोर तरतुदी आणत आहे. या अंतर्गत, जर एखाद्याची कार रस्त्यात एखाद्याला धडकली आणि पीडितेला मदत करण्याऐवजी चालकाने पीडितेला मृत सोडले किंवा स्वत: कार घेऊन पळून गेला, तर त्याला 10 वर्षांचा तुरुंगवास आणि दंड भरावा लागेल. जे पीडितेला रुग्णालयात घेऊन जातात किंवा पोलीस प्रशासनाला माहिती देतात त्यांना दिलासा दिला जाईल. आतापर्यंत आयपीसीमध्ये अशी तरतूद नव्हती.

किंबहुना, हा कायदा म्हणजे दुधारी तलवार आहे, असा युक्तिवाद वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि वाहनचालक करत आहेत. अपघातानंतर वाहनचालक मदत मागण्यासाठी थांबला तरी त्याच्यावर जमावाकडून हल्ला होण्याचा धोका असतो. अनेकदा अशा वेळी जमाव हिंसक होतो. हल्ल्यातून वाचण्यासाठी तो पळून गेला तर त्याला कायद्यानुसार 10 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागेल. त्यामुळे रस्त्यावर अपघात होऊन त्याचे संपूर्ण जीवन प्रभावित होऊ शकते. याच्या निषेधार्थ बंगाल, बिहार, यूपी, हरियाणा, दिल्ली आणि मध्यप्रदेशसह अनेक राज्यांमध्ये ट्रक चालक आणि इतर लोक रस्ता रोको आंदोलन करत आहेत.

अशा वेळी वाहनचालकांना दिलासा मिळणार, कायदा काय सांगतो

नव्या कायद्यानुसार, वाहनाला धडक देणारी व्यक्ती चुकीच्या पद्धतीने वाहनासमोर आली किंवा बेकायदेशीरपणे रस्ता ओलांडत असेल, तर अशा वेळी वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. अशा प्रकरणांमध्ये कमाल 5 वर्षांची शिक्षा आणि दंड होऊ शकतो. चुकीच्या पद्धतीने वाहन चालवल्यामुळे समस्या उद्भवल्यास चालकाला 10 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. या तरतुदीबाबत वाहनचालक चिंता व्यक्त करत आहेत. धुक्यामुळे अपघातही होत असल्याचे अनेक वाहनचालकांनी सांगितले. जर अशा प्रकरणात 10 वर्षांची शिक्षा झाली तर कोणतीही चूक न करता एवढी मोठी शिक्षा भोगावी लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT