Utkal Bang words missing from national anthem in Hindi government books  Dainik Gomantak
देश

हिंदीच्या पुस्तकात राष्ट्रगीतातून 'उत्कल बंग' गायब, म्हणे, ही तर 'प्रिंटिंगसे मिस्टेक'

यावर्षी मुलांना वाटण्यात आलेल्या नवीन पुस्तकांमध्ये अपूर्ण राष्ट्रगीत प्रकाशित करण्यात आले आहे. या चुकीनंतर आता पुस्तकांमध्ये राष्ट्रगीत दुरुस्त करून घेण्याबाबत चर्चा सुरू आहे.

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील सरकारी शाळांच्या पुस्तकांमध्ये मोठी त्रुटी आढळली आहे. यावर्षी मुलांना वाटण्यात आलेल्या नवीन पुस्तकांमध्ये अपूर्ण राष्ट्रगीत प्रकाशित करण्यात आले आहे. या चुकीनंतर आता पुस्तकांमध्ये राष्ट्रगीत दुरुस्त करून घेण्याबाबत अधिकारी बोलत आहेत. कौशांबीमध्ये, यूपीच्या सरकारी शाळांचे (परिषद विद्यालय) नवीन सत्र सुरू झाले आहे. मात्र त्यानंतरही मुलांना पाठ्यपुस्तके उशिरा पोहोचवण्यात आली. नुकतेच मुलांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. त्यातही मोठी चूक आढळली आहे.

मुलांना वाटण्यात आलेल्या इयत्ता पाचवीच्या हिंदी विषयाच्या वाटिका पुस्तकातील राष्ट्रगीताच्या ओळींमधून 'उत्कल आणि बंग' हे शब्द गायब आहेत. मात्र, मूलभूत शिक्षणाधिकाऱ्यांनी याला प्रिंटिंग मिस्टेक असल्याचे सांगितले आहे. पाचवी इयत्तेतील मुलांसाठीचे हिंदी पुस्तक वाटिका नावाने चालवले जाते. आणि त्यामध्ये ही चूक दिसून आली आहे.

तिसऱ्या ओळीत चूक आहे

जन-गण-मन पासून पंजाब-सिंध-गुजरात-मराठा पर्यंत पुस्तकात लिहिलेले राष्ट्रगीत बरोबर लिहिले आहे, पण त्यानंतर द्रविडसमोर उत्कल आणि बंग हे दोन शब्द गायब आहेत. यानंतर थेट विंध्य-हिमाचल-यमुना-गंगा अशी पुढची ओळ सुरू होते. ही चूक एक-दोन पुस्तकांत नाही, तर पाचवीच्या सर्वच पुस्तकांतून दिसून आली आहे.

Utkal Bang words missing from national anthem in Hindi government books

कौशांबी जिल्ह्यात 1089 परिषद शाळा कार्यरत आहेत. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत सुमारे 1 लाख 82 हजार विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. परिषद शाळेतील सत्र एप्रिल महिन्यात योग्य वेळी सुरू झाले. मात्र सरकारने पुस्तके देण्यास दिरंगाई केली. बरेच दिवस मुलांना जुन्या पुस्तकांमधूनच शिक्षण घ्यावे लागत होते.

Watika hindi Book

'प्रिंटिंग चुकल्यामुळे असे घडल्याचे त्यांनी सांगितले. हे प्रकाशन त्रुटीमुळे झाले आहे. ते दुरुस्त करण्यासाठी वरिष्ठांना कळवले जाईल. तेही लवकरच दुरुस्त करू. मानवी चुकांमुळे हे घडले आहे. कोणीही जाणीवपूर्वक ही चूक केलेली नाही,' असे या चुकीवर मूलभूत शिक्षणाधिकारी प्रकाश सिंह यांनी स्पष्टीकरण दिले.

याआधीही उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रगीतावरून वाद निर्माण झाले आहेत. यापूर्वी रमजानच्या सुट्टीनंतर उघडलेल्या सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत सक्तीचे करण्याचे आदेश देण्यात आले होते. हे आदेश सर्व मान्यताप्राप्त, अनुदानित आणि विनाअनुदानित मदरशांसाठी जारी करण्यात आले आहेत. राज्यातील मान्यताप्राप्त आणि अनुदानित मदरशांमध्ये शैक्षणिक सत्र सुरू होताच राष्ट्रगीत अनिवार्यपणे गायले जावे, असे पत्र सर्व अल्पसंख्याक कल्याण अधिकाऱ्यांना देण्यात आले. नंतर त्याची अंमलबजावणीही झाली.

दरम्यान, हा आदेश देणारे अल्पसंख्याक कल्याण विभागाचे संचालक एस.एन.पांडे यांच्याकडून राज्यातील मदरसा बोर्डाच्या कुलसचिवपदाचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे. 24 मार्च रोजी यूपी मदरसा शिक्षण परिषदेची बैठक झाली. या बैठकीतच मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. 20 मार्च ते 11 मे या कालावधीत मदरशांना सुटी असल्याने या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. 12 मे रोजी मदरसे उघडल्यानंतर हा आदेश सर्व मदरशांमध्ये लागू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Islamic State Rebels Attack: कांगोमध्ये रक्तपात! चर्चवरील हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, IS समर्थित दहशतवाद्यांचा हात

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral: मास्तर बनला प्रभु देवा...मुकाबला गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पोरं झाली थक्क, WATCH VIDEO

Shravan Somvar 2025: मन:शांती आणि समस्यामुक्तीसाठी श्रावण सोमवार; जाणून घ्या रुद्राभिषेकाचे महत्त्व आणि सोपी पद्धत

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

SCROLL FOR NEXT