Rakesh Tikait Dainik Gomantak
देश

'जोपर्यंत एमएसपी वर कायदा होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही'

याच पाश्वभूमीवर पंतप्रधान मोदी (Prime Minister Modi) यांनी आज तीन्ही कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली.

दैनिक गोमन्तक

मागील दीड वर्षापासून मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्याचा विरोध करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणासह अनेक राज्यातील शेतकरी आंदोलन करत आहेत. याच पाश्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी आज तीन्ही कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली.

यातच आता राकेश टीकैत (Rakesh Tikait) यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत मोदी सरकार जोपर्यंत एमएसपी वर कायदा करत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे माध्यमाशी बोलताना सांगितले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कृषीविषयक तीनही कायदे मागे (Three Farm Laws) घेण्याच्या निर्णयानंतर देशातील अन्नदात्यानी सत्याग्रह करून डोके टेकवले, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शुक्रवारी सांगितले. काही महिन्यांपूर्वी पंजाबमध्ये कृषी कायद्यांविरोधात काढलेल्या दौऱ्यादरम्यान त्यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ शेअर करून राहुल गांधींनी हे वक्तव्य केलं आहे.

राहुल गांधींनी ट्विट करून लिहिले की, 'देशाच्या अन्नदात्याने सत्याग्रहाने अहंकाराचे डोके झुकवले. अन्यायाविरुद्धच्या या विजयाबद्दल अभिनंदन! जय हिंद, जय हिंद का किसान!.'' या कमेंटसह राहुल गांधींनी स्वतःचा एक जुना व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये ते 'आमचे शेतकरी जे काही करत आहेत त्याचा मला अभिमान आहे' असे म्हणताना दिसत आहे. मी माझ्या शेतकर्‍यांना पूर्ण पाठिंबा देतो आणि नेहमीच करत राहीन. एक दिवस हा कायदा मागे घेण्यास केंद्र सरकारला नक्कीच भाग पडेल हे माझे शब्द चिन्हांकित करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cricket Association: सलग पाचवा मोसम की नवा 'पाहुणा' खेळाडू? अर्जुन तेंडुलकरच्या गोव्यातील भवितव्याचा फैसला लवकरच!

मुरगाव, वास्कोत वीज बिलांचा शॉक! वाढीव बिलांमुळे संतप्त नागरिकांनी अभियंत्याला घेतलं फैलावर; विद्युत भवनात राडा

Goa Fraud Case: चार्ल्स शोभराजचा ‘चेला’ अखेर गजाआड! 35 वर्षांत 300 पंचतारांकित हॉटेल्‍सना गंडा; गोव्यातही राहून गेला महाठग

अरब व्यापाऱ्यांनी भारतात आणले आणि इथेच स्थिरावले, 'गोरखचिंचे'च्या प्रवासाची रंजक कहाणी

Goa Kala Academy: कला अकादमी, 'क्या पाया क्या खोया?'

SCROLL FOR NEXT