Rakesh Tikait Dainik Gomantak
देश

'जोपर्यंत एमएसपी वर कायदा होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही'

याच पाश्वभूमीवर पंतप्रधान मोदी (Prime Minister Modi) यांनी आज तीन्ही कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली.

दैनिक गोमन्तक

मागील दीड वर्षापासून मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्याचा विरोध करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणासह अनेक राज्यातील शेतकरी आंदोलन करत आहेत. याच पाश्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी आज तीन्ही कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली.

यातच आता राकेश टीकैत (Rakesh Tikait) यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत मोदी सरकार जोपर्यंत एमएसपी वर कायदा करत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे माध्यमाशी बोलताना सांगितले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कृषीविषयक तीनही कायदे मागे (Three Farm Laws) घेण्याच्या निर्णयानंतर देशातील अन्नदात्यानी सत्याग्रह करून डोके टेकवले, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शुक्रवारी सांगितले. काही महिन्यांपूर्वी पंजाबमध्ये कृषी कायद्यांविरोधात काढलेल्या दौऱ्यादरम्यान त्यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ शेअर करून राहुल गांधींनी हे वक्तव्य केलं आहे.

राहुल गांधींनी ट्विट करून लिहिले की, 'देशाच्या अन्नदात्याने सत्याग्रहाने अहंकाराचे डोके झुकवले. अन्यायाविरुद्धच्या या विजयाबद्दल अभिनंदन! जय हिंद, जय हिंद का किसान!.'' या कमेंटसह राहुल गांधींनी स्वतःचा एक जुना व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये ते 'आमचे शेतकरी जे काही करत आहेत त्याचा मला अभिमान आहे' असे म्हणताना दिसत आहे. मी माझ्या शेतकर्‍यांना पूर्ण पाठिंबा देतो आणि नेहमीच करत राहीन. एक दिवस हा कायदा मागे घेण्यास केंद्र सरकारला नक्कीच भाग पडेल हे माझे शब्द चिन्हांकित करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Who After Ravi Naik: फोंड्यातील पोटनिवडणुकीवरून भाजपसमोर पेच! रवी नाईक यांचे कनिष्‍ठ सुपुत्र 'रॉय' यांच्या नावाचाही आग्रह

Ranji Trophy 2025: हुर्रे! गोव्याची दणदणीत विजयी ‘दिवाळी’, चंडीगडला नमवले; पाहुणा 'ललित' सामन्याचा मानकरी

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

SCROLL FOR NEXT