हैदराबाद: तेलंगणातील काँग्रेस सरकारने २०२४-२५ मध्ये केलेल्या जातिनिहाय सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यात १८ वर्षांखालील सुमारे पाच टक्के म्हणजेच २.१६ लाख मुलींचे बालविवाह झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
तेलंगणा सरकारने काल हा अहवाल प्रसिद्ध केला. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्या. बी. सुदर्शन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखालील स्वतंत्र तज्ज्ञ कार्यगटाने (आयईडब्ल्यूजी) हे निष्कर्ष नोंदविले आहेत. त्यातील एका निष्कर्षानुसार अय्यंगार आणि अय्यर समुदायामध्ये आंतरजातीय विवाहांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. त्यापाठोपाठ ख्रिश्चन (मागासवर्गीय आणि अनुसूचित जाती) आणि राजूज समुदायाचा क्रमांक लागतो.
शिक्षण व सामाजिक स्थिती
राज्यातील सुमारे दोन तृतीयांश महिलांचे शिक्षण माध्यमिक पातळीपर्यंत
आदिवासी मुलींच्या शैक्षणिक प्रगतीची स्थिती चिंताजनक
ब्राह्मण महिलांमध्ये हे प्रमाण केवळ ३६.२ टक्के
राजू, जैन, कोमटी आणि कम्मा समुदायातील महिलांची शैक्षणिक स्थिती ऐतिहासिक सामाजिक-आर्थिक स्थानामुळे उत्तम
अनुसूचित जाती आणि जमातींमधील महिलांचे शिक्षण राज्याच्या सरासरीपेक्षा कमी
शैक्षणिक दरी कमी करण्यासाठी विशेष उपाययोजनांची गरज
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.