Tamil Nadu Chief Minister K Palaniswami has slashed metro fares
Tamil Nadu Chief Minister K Palaniswami has slashed metro fares 
देश

मेट्रो संबंधी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

गोमन्तक वृत्तसेवा

चेन्नई: तामिळनाडूमधील आगामी निवडणुका पाहता मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांच्या सातत्याने केलेल्या मागणीनंतर राज्य सरकारने मेट्रोच्या भाडेदरात मोठी कपात केली आहे. मेट्रोच्या भाड्यात 20 रुपयांची कपात जाहीर करण्यात आली आहे.

आता मेट्रोचे भाडे 70 रुपयांवरून 50 रुपये करण्यात आले आहे. मात्र किमान भाड्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मेट्रोच्या भाड्याचे हे नवीन दर 22 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. आज शनिवारी तामिळनाडूचे मुख्यमंत्री के पलानीस्वामी यांनी मेट्रोच्या भाड्यांचे नवीन दर जाहीर केले. राज्य सरकारने केलेल्या घोषणेनुसार आता प्रवाशांना दोन किलोमीटरसाठी दहा रुपये आणि दोन ते पाच किलोमीटरसाठी 20 रुपये द्यावे लागतील. त्याच वेळी, एका प्रवाशाला 5-12 किमी अंतर पार करण्यासाठी 30 रुपये द्यावे लागतील. 

याशिवाय 21 किलोमीटरचे अंतर जाण्यासाठी 40 रुपये आणि 21 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी 50 रुपये मोजावे लागतील. याशिवाय जे प्रवासी क्यूआर कोड किंवा सीएमआरएल स्मार्ट कार्डचा वापर करून मेट्रोचे तिकिट बुक करतील त्यांच्यासाठी 20 टक्के स्वतंत्र सवलत देण्यात आली आहे. त्याचबरोबर रविवार आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी प्रवास करणाऱ्यांना त्यांच्या रोजच्या तिकिटांवर 50 टक्के सूट मिळणार आहे. 45 किलोमीटरसाठी 100 रुपयांच्या अमर्यादित डे पासचा वापर करणारे प्रवासी आता विम्को नगरमध्ये जाण्यास प्रवास करू शकणार आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विम्को नगरचे उद्घाटन केले आहे. 

माध्यामांनी दिलेल्या माहितीनुसार चेन्नई मेट्रोमध्ये एका दिवसात 1.2 लाख लोक प्रवास करतात. तर एका दिवसात प्रवास करणार्‍यांची संख्या दहा हजारांवरून 75,000 झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT