Earthquake Dainik Gomantak
देश

Earthquake: सीरीया-तुर्कीसारखाच भारतातही येणार भूकंप

दैनिक गोमन्तक

Earthquake: तुर्की आणि सिरिया मधील भूकंपामुळे संपूर्ण जगाला धक्का बसला आहे.आता भारतातही तुर्की आणि सिरियासारखा भूकंप होऊ शकतो असे भारतीय वैज्ञानिकाने भाकित केले आहे.

IIT कानपूरच्या अर्थसायंन्स ( Earth Science ) विभागाचे प्रोफेसर जावेद मलिक यांनी हे वक्तव्य केले आहे. येणाऱ्या दोन दशक किंवा त्याआधी भारतात भूकंप होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

या भूकंपाचा केंद्रबिंदू हिमालय किंवा अंदमान निकोबार असू शकतो त्यामुळे सावधानी बाळगणे जरुरी असल्याचे प्रोफेसर जावेद यांनी म्हटले आहे. मागच्या बऱ्याच काळापासून प्रोफेसर जावेद हे अंदमान निकोबार , कच्छ आणि उत्तराखंडच्या भागात पृथ्वीच्या बदलाचा अभ्यास करत आहेत.

प्रोफेसर जावेद यांच्या म्हणण्यानुसार, नेपाळमध्ये एखादा भूकंप आला तर उत्तरप्रदेशपर्यत त्याचा परिणाम दिसू शकतो. 1934 मध्ये नेपाळ आणि बिहार( Bihar )मध्येआलेल्या भूकंपाचा दूरपर्यत परिणाम दिसून आला होता. ]

1803 मध्ये नेपाळमध्ये आलेल्या भूकंपाचा मथुरा( Mathura )पर्यंत परिणाम दिसून आला होता.पृथ्वीच्या अंतर्भागात इंडियन आणि युरेशिअन प्लेटची टक्कर झाल्याने 2015 मध्ये नेपाळ मध्ये भूकंप झाला होता.

प्रोफेसर मलिक यांनी केलेल्या अभ्यासानुसार, भूकंपच्या तरंगलहरी जेव्हा गंगेच्या प्रदेशात प्रवास करत असतात तेव्हा त्या जास्त ताकदवान होतात.

दरम्यान, तुर्की( Turkey )मध्ये मृतांची संख्या 21 हजारांवर गेली आहे. या भूकंपाने हजारो कुटुंबे उद्धवस्त केली आहेत आणि हजारो लोक हॉस्पिटलमध्ये आहेत. यात झालेल्या जीवीतहानी संपूर्ण जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT