Team India Dainik Gomantak
देश

IND vs WI 2nd Test: पहिला विजय झाला, आता मालिका विजयाची 'हुकमी तयारी'! दुसरा सामन्याचे सर्व डिटेल्स एका क्लिकवर वाचा

Team India: भारत (India) आणि वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना 10 ऑक्टोबर (शुक्रवार) पासून खेळला जाईल.

Manish Jadhav

IND vs WI 2nd Test: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका सध्या सुरु आहे. अहमदाबाद येथे झालेला पहिला सामना भारतीय संघाने एक डाव आणि 140 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. आता दोन्ही संघांची नजर दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यावर आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. पहिल्या सामन्यातील मोठ्या विजयामुळे भारतीय संघाचे मनोबल वाढलेले असून ते मालिका 2-0 ने जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील.

दिल्लीत रंगणार दुसरा कसोटी सामना

भारत (India) आणि वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना 10 ऑक्टोबर (शुक्रवार) पासून खेळला जाईल.

  • स्थळ: हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे.

  • वेळ: सामन्याला सकाळी 9:30 वाजता सुरुवात होईल. त्यापूर्वी सकाळी 9:00 वाजता टॉस (नाणेफेक) होईल.

  • कुठे पाहणार सामना: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हा सामना जिओ हॉटस्टारवर तुम्हाला पाहता येईल.

दिल्लीमध्ये खूप दिवसांनी कसोटी क्रिकेटचा सामना होत असल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये या सामन्याबद्दल मोठी उत्सुकता आहे.

पाच दिवसांचा खेळ, पण शक्यता कमी

दरम्यान, हा कसोटी सामना पाच दिवस म्हणजेच 14 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. मात्र, पहिल्या सामन्यातील वेस्ट इंडीज संघाचे निराशाजनक प्रदर्शन पाहता, हा सामना पूर्ण पाच दिवस चालेल याची शक्यता कमी आहे. पहिल्या सामन्यात वेस्ट इंडीजची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांत भारतीय संघाने वर्चस्व राखले होते.

भारतीय संघाने (Team India) आपली सर्व ताकद पणाला लावली असून वेस्ट इंडीजला सहजासहजी सामना जिंकू देणार नाही हे निश्चित आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघाने तरुण उत्साह आणि अनुभवाचा समन्वय साधत वेस्ट इंडीजला पुन्हा एकदा धूळ चारण्याचा मानस ठेवला आहे.

विश्व कसोटी चॅम्पियनशिप (WTC) अंतर्गत सामना

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील ही संपूर्ण मालिका विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या 2025-2027 च्या सायकलचा एक भाग आहे. त्यामुळे मालिकेतील प्रत्येक सामन्याचे महत्त्व खूप मोठे आहे. मालिका 2-0 ने जिंकल्यास भारतीय संघाला WTC च्या गुणतक्त्यात (Points Table) आपले पीसीटी (PCT - Points Conversion Table) वाढवण्यात मदत होईल. WTC च्या नियमानुसार, एकाही सामन्यातील छोटीशी चूक संघाला महागात पडू शकते. त्यामुळे भारतीय संघ या मालिकेत आपली सर्वात मजबूत प्लेइंग-11 (Playing-11) खेळवत आहे.

भारतीय संघाचा वेस्ट इंडीजवर वरचष्मा असला तरी, वेस्ट इंडीजचा संघ जोरदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. मात्र, दिल्लीतील खेळपट्टीचा फायदा घेत भारतीय संघ दुसऱ्या सामन्यातही मोठा विजय मिळवण्यास उत्सुक असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA Final 2025: हरमनची टीम इंडिया बनली 'वर्ल्डकप चॅम्पियन'; वुल्फर्टची झुंजार शतकी खेळी ठरली व्यर्थ; दिप्ती शर्माच्या भेदक माऱ्याने केली कमाल! VIDEO

India vs Australia: चौथ्या टी-20 सामन्यापूर्वी टीम इंडियाला बसला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू अचानक मायदेशी, काय कारण?

Bicholim Accident: डिचोलीत जीपगाडीची झाडाला धडक, कर्नाटकमधील तिघेजण जखमी; सहा पर्यटक सुखरूप

Uguem Firing: उगवे गोळीबार प्रकरणात दोघे पोलिस! एकूण 5 जणांना अटक; गुप्तचर यंत्रणेच्या आधारे कारवाई

वागातोर नाईट क्लबमध्ये अरेरावीचा कळस! बाऊन्सर्सनी पर्यटकांना बडवले; लोखंडी सळ्या, दांडक्यांनी केली मारहाण

SCROLL FOR NEXT