सारांश
भारत हा विविधतेने नटलेला देश असून प्रत्येक ठिकाणी नवी गोष्ट आणि नवा अनुभव मिळतो.
ताजमहाल, गोव्याचे समुद्रकिनारे, जयपूरचे रंग आणि वाराणसीची आरती ही त्याची वैशिष्ट्ये आहेत.
इतका मोठा देश फक्त १४ दिवसांत फिरणे हे खरेच आव्हानात्मक आहे.
Budget India Tour 14 Days: आपला भारत देश एवढा मोठा आहे की इथे प्रत्येक गल्लीत, चौकात, आणि वळणावर एक नवी गोष्ट, एक नवी कहाणी पाहायला आणि ऐकायला मिळते. एका टोकाला प्रेमाचे प्रतीक असलेला ताजमहाल, तर दुसरीकडे गोव्याचा समुद्रकिनारा. जयपूरच्या वाऱ्यांमध्ये गुलाबी रंग मिसळलेला आहे, तर वाराणसीची संध्याकाळची आरती मनाला शांतता देते. जर तुम्हाला हा एवढा मोठा देश १४ दिवसांत फिरायला सांगितलं तर?
साहजिकच फक्त १४ दिवसांत संपूर्ण भारत फिरणे अशक्य आहे, पण जर योग्य नियोजन केले, तर दोन आठवड्यात तुम्ही भारतातील अनेक राज्यांची झलक पाहू शकता. ही झलक अशी असेल, जी रंगांनी भरलेली, वेगवेगळे आवाज गुंजणारी आणि सुगंधांनी दरवळणारी असेल आणि तुमच्या आठवणीत ती कायमची घर करून राहील. आता हा प्रवास कसा कराल याच एक सोपा प्लॅन आम्ही तुम्हाला देणार आहोत.
तुमच्या प्रवासाची सुरुवात दिल्लीतून करा. इथे लाल किल्ला, इंडिया गेट आणि जुन्या दिल्लीतील चांदनी चौकामधील मजा अनुभवायला मिळते. त्यानंतर आग्र्याला जाऊन ताजमहाल पहा. फोटो आणि प्रत्यक्षात ताजमहाल पाहण्यात किती फरक आहे, हे तुम्हाला तिथे गेल्यावर कळेल. त्यानंतर जयपूर, जिथे आमेर किल्ला, हवा महल आणि गुलाबी शहराच्या गल्ल्या आहेत. इथे रिक्षातून फिरण्याचा अनुभव खूपच खास असतो.
भारतात प्रवास करणे म्हणजे केवळ एखाद्या ठिकाणी पोहोचणे नाही, तर तो प्रवास अनुभवायचा असतो. रात्रीच्या गाड्या या अनुभवाचा एक भाग आहेत. रात्री ट्रेन पकडा आणि सकाळी एका नव्या शहरात, नव्या वातावरणात दिवसाची सुरुवात करा.
दोन आठवड्यांच्या प्रवासात सर्वात कठीण निर्णय हाच असतो की, डोंगराळ भागात फिरायला जावे की समुद्रकिनाऱ्याचा आनंद घ्यावा. कारण १४ दिवसांत दोन्ही ठिकाणी जाणे खूपच घाईचे आणि थकवणारे ठरू शकते. जर तुम्हाला थंड हवा, उंच डोंगर आणि गंगा नदीच्या शांत प्रवाहाचा अनुभव घ्यायचा असेल, तर मनाली किंवा ऋषिकेश योग्य पर्याय आहेत.
पण जर तुम्हाला नारळाची झाडे, सोनेरी वाळू आणि समुद्राच्या लाटा आवडत असतील, तर गोव्यापेक्षा चांगली जागा कोणतीही नाही. जर तुम्हाला खरी शांतता हवी असेल, तर केरळच्या बॅकवॉटरमधील हाउसबोटवर काही वेळ घालवा. पाण्याच्या शांत आवाजात आणि आजूबाजूच्या हिरवळीतील हा अनुभव आयुष्यभर आठवणीत राहील.
जर तुम्हाला भारत फिरणे म्हणजे फक्त दिल्ली, मुंबई किंवा कोलकाता असं वाटत असेल तर तुमचा अनुभव अपूर्ण आहे, कारण भारताची खरी चव, खरी संस्कृती आणि खऱ्या कथा मोठ्या शहरांपेक्षा छोट्या गावांमध्ये पाहायला मिळतात.
पुष्कर, जिथे उंटांची जत्रा भरते आणि गावाच्या गल्ल्यांमध्ये रंगीबेरंगी दृश्ये विखुरलेली दिसतात. तर दुसरीकडे हंपी, जिथे पडलेल्या इमारतींमध्येही इतिहास जिवंत आहे. प्रत्येक दगड काहीतरी रहस्य सांगत असतो. तसेच, पुडुचेरी, जिथे आजही फ्रेंच गल्ल्यांमध्ये युरोपची झलक दिसते. म्हणजेच खरा भारत या गावांच्या आणि छोट्या शहरांमधेच आहे.
भारतातील प्रत्येक शहरात एवढं काही आहे की, ते पूर्ण पाहण्यासाठी महिन्यांचा वेळ लागेल. पण तुमच्याकडे फक्त १४ दिवस असतील, तर ‘अर्ध्या दिवसाचा फॉर्म्युला’ वापरू शकता. सकाळी सूर्य उगवण्याआधीच एखाद्या मंदिर किंवा घाटावर पोहोचा. त्यानंतर दुपारी स्थानिक बाजारात फिरून तिथल्या अस्सल पदार्थांचा आस्वाद घ्या आणि संध्याकाळ होताच बॅग भरून पुढच्या शहरासाठी ट्रेन पकडा. विश्वास ठेवा, या पद्धतीने तुम्ही कमी वेळेतही प्रत्येक ठिकाणचा खरा अनुभव घेऊ शकता.
प्रश्न व उत्तरे (FAQ's)
प्रश्न: भारतात प्रत्येक ठिकाणी काय पाहायला आणि ऐकायला मिळते? (What can be seen and heard at every place in India?)
उत्तर: प्रत्येक गल्लीत, चौकात आणि वळणावर नवी गोष्ट व नवी कहाणी पाहायला मिळते.
प्रश्न: भारतात प्रेमाचे प्रतीक म्हणून कोणती वास्तू ओळखली जाते? (Which monument in India is known as a symbol of love?)
उत्तर: ताजमहाल प्रेमाचे प्रतीक मानले जाते.
प्रश्न: गोव्यातील कोणती खास जागा पर्यटकांना आकर्षित करते? (Which special place in Goa attracts tourists?)
उत्तर: गोव्याचे समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करतात.
प्रश्न: जयपूरची खास ओळख कोणती आहे? (What is Jaipur especially known for?)
उत्तर: जयपूरची खास ओळख म्हणजे गुलाबी शहर व त्याची हवा.
प्रश्न: वाराणसीमध्ये कोणती गोष्ट मनाला शांतता देते? (What in Varanasi brings peace to the mind?)
उत्तर: वाराणसीची संध्याकाळची आरती मनाला शांतता देते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.