OFFICE 2.jpg
OFFICE 2.jpg 
देश

सरकारी कर्मचाऱ्यांचे पालक कोरोना पॉझिटिव्ह आल्यास मिळणार 15 दिवसांची रजा

गोमंन्तक वृत्तसेवा

नवी दिल्ली: देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना केंद्रीय कर्मचारी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आदेशानुसार, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एकादी जबाबदार व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्यास त्यास 15 दिवसांची रजा मिळेल. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, रजेची मुदत संपल्यानंतर जर कुटुबांतील व्यक्ती रुग्णालयात असल्यास त्याला रुग्ण बरा होईपर्यंत रजेची मुदत वाढवून देण्यात येईल. कोरोना काळात उपचार घेणे, रुग्णालयामध्ये भरती किंवा विलगीकरणात ठेवणे याबाबत सरकारी नोकरदारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते, त्यासंबंधी मंत्रालयाने सविस्तर आदेश जाहीर केला आहे. (Centre to grant 15 days leave for government employees whose parents test positive for COVID-19)

आदेशात मंत्रालयाने म्हटले आहे की, जर सरकारी कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यास त्यास 20 दिवसांची रजा मंजूर करण्यात येईल. 

दरम्यान “कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर 20 दिवसांनंतर रुग्णालयात दाखल झाल्यास त्याला रुग्णालयात केल्याच्या कागदोपत्री पुरावे दिल्यास त्याला रजा मंजूर करण्यात येईल,” असे मंत्रालयाच्या आदेशात म्हटले आहे. 

सहकारी कुटुंबातील सदस्य किंवा पालक (अवलंबून असले किंवा नसले तरी त्याच्या सोबत राहणारे) कोविड  चाचणी पॉझिटिव्ह असल्यास सरकारी कर्मचार्‍यास  15 दिवसांची खास कॅज्युअल रजा देण्यात येईल.

मंत्रालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की जर सरकारी कर्मचारी कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्तीशी थेट संपर्कात आला आणि जर घरात विलगीकरणात असेल तर “त्याला सात दिवसांच्या कालावधीत घरातून काम करण्याची मुभा देण्यात येणार आहे. 

तसेच पुढे  म्हटले आहे की, सरकारी कर्मचाऱ्याने विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केला असेल तरिही जर तो कंटेन्टमेंट झोनमध्ये राहत असेल तर त्याला तो परिसर नॉन कंटेन्टमेंट झोन होईपर्यंत घरातून काम करण्याची मुभा असेल. पुढील आदेश येईपर्यंत हे नियम लागू राहतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT