bihar
bihar 
देश

बिहारमध्ये ३१ पर्यंत लॉकडाउन लागू राहणार

PTI

पाटणा

अनलॉक-२ च्या काळात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने बिहार सरकारची काळजी वाढली आहे. त्यामुळे येत्या ३१ जुलैपर्यंत राज्यात लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
बिहारमध्ये सलग दुसऱ्या दिवशी ११०० हून अधिक प्रकरणे सापडल्यानंतर बिहार सरकारने पुन्हा लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी आपत्कालिन व्यवस्थापन विभागाची बैठक बोलावण्यात आली आणि त्यात या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. विशेष म्हणजे राज्यातील दहा जिल्ह्यात पाटणा, भागलपूर, पुर्णिया, बक्सर, नवाडा, कैमूर, मोतिहारी, मुंगेर, खगडिया आणि किशनगंज येथे अगोदरच लॉकडाउन लागू आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत चालली आहे. जून महिन्यात एका दिवसात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सरासरी अडीचशे असताना जुलै महिन्यात ती संख्या दुप्पट तिप्पट झाली. आता दररोज हजार ते १२०० रुग्ण सापडत आहेत. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन गेल्या आठवड्यात मुख्य सचिव दिपक कुमार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या क्षेत्रात कोरोनाच्या तीव्रतेचे आकलन करुन गरज पडल्यास लॉकडाउन लागू करण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानुसार भागलपूर आणि नंतर पाटण्यात दहा जुलैपासून लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला. तर दुसऱ्याच दिवशी १५ जिल्ह्यात कमी प्रमाणात लॉकडाउन लागू करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT