temple Dainik Gomantak
देश

'हिंदू धर्म रक्षा'साठी आंध्र प्रदेशात बांधली जाणार 3 हजार मंदिरे

आंध्र प्रदेशच्या जगन मोहन सरकारने राज्यात ३ हजार हिंदू मंदिरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आंध्र प्रदेशच्या जगन मोहन सरकारने राज्यात 3 हजार हिंदू मंदिरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण राज्यात मंदिरे बांधण्याचे काम वेगाने सुरू असल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे. 

तीर्थक्षेत्रांचा विकास केला जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री कोट्टू सत्यनारायण यांनी माहिती दिली की सीएम रेड्डी यांनी हा निर्णय हिंदू धर्माचे रक्षण आणि प्रचार करण्यासाठी घेतला आहे. सत्यनारायण म्हणाले, मोठ्या प्रमाणावर हिंदू धर्माचा प्रसार करण्यासाठी सरकारने दुर्बल घटकांच्या भागात मंदिरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

मंदिरांच्या बांधकामासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानच्या श्री वाणी ट्रस्टच्या वतीने प्रत्येक मंदिराच्या बांधकामासाठी 10 लाख रुपये खर्च केले जाणार आहे. यापूर्वी राज्यात 1330 मंदिरे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

आता या यादीत आणखी 1465 मंदिरांचा समावेश झाला आहे. याशिवाय काही आमदारांच्या मागणीनुसार आणखी 200 मंदिरे बांधली जाणार आहेत. उर्वरित मंदिरे स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने बांधण्यात येणार आहेत. सध्या संपूर्ण राज्यात 978  मंदिरांच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

तीन तरुणी अन् एक तरुण... आश्वे-मांद्रे रस्त्यावर एकाच दुचाकीवरून चौघांचा जीवघेणा प्रवास, वाहतूक नियमांना हरताळ

Train Accident: धूर, आरडाओरडा आणि रक्ताने माखलेले लोक! लंडनमध्ये दोन ट्रेनची भीषण धडक; चालकाचा जागीच मृत्यू, 80 हून अधिक प्रवासी जखमी VIDEO

'ओपन जेल'साठी राजस्‍थान दौरा; कोर्टाचे गृह विभागाला निर्देश, कारागृह नियम दुरुस्तीसाठी समिती

NEET Exam: साडेचार हजार विद्यार्थी देणार 'नीट' परीक्षा; सरकारी यंत्रणा सज्ज, परीक्षा केंद्रांवर कदंबची विशेष बससेवा

Kisan Credit Card Scheme: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! आरबीआयने 'किसान क्रेडिट कार्ड'च्या नियमात केला मोठा बदल; कधीपासून होणार लागू?

SCROLL FOR NEXT