माजी निवडकर्ते सरनदीप सिंग यांचे रोहितच्या कर्णधारपदावर 'मोठे' विधान

केएल राहुल (KL Rahul) किंवा ऋषभ पंत (Rishabh Pant) हे कर्णधारपदासाठी चांगले पर्याय
Former Selector Sarandeep Singh
Former Selector Sarandeep SinghDainik Gomantak

Cricket: भारतीय संघाचे (Team India) माजी निवडकर्ते सरनदीप सिंग (Former Selector Sarandeep Singh) म्हणाले की, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये विराट कोहलीनंतर (Virat Kohali) कर्णधारपदासाठी रोहित शर्माची (Rohit Sharma) पहिली पसंती असली तरी तो या पदावर जास्त काळ टिकू शकणार नाही. विश्वचषकानंतर विराट कोहली टी-20 संघाचे कर्णधारपद सोडणार असून त्याच्या जागी रोहित कर्णधारपद भूषवणार आहे. आता एकदिवसीय सामन्यांच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि सरनदीपने सांगितले की रोहित या पदासाठी योग्य आहे परंतु तो ही भूमिका केवळ अल्प कालावधीसाठीच बजावू शकेल.

Former Selector Sarandeep Singh
क्रिकेटमधील अप्सरेला पाहून तुम्हीही व्हाल क्लिन बोल्ड!

सरनदीपने पीटीआयला सांगितले की, "रोहित हा एक चांगला पर्याय आहे (मर्यादित षटकांच्या संघाचे नेतृत्व करण्यासाठी), तो तुमच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. पण निवड समितीने त्याला काही वर्षांसाठी (२०२३ एकदिवसीय विश्वचषकापर्यंत) कर्णधार बनवायचे की दीर्घकाळ संघाचे नेतृत्व करू शकणार्‍या खेळाडूवर जबाबदारी सोपवायची हे ठरवायचे आहे. जर ते खूप पुढे दिसत असतील तर केएल राहुल आणि ऋषभ पंत हे चांगले पर्याय असू शकतात.

आम्ही तुम्हाला सांगतो की, टी-20 विश्वचषकात भारताची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे आणि सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये त्यांनी पराभवाची चव चाखली आहे. भारताच्या पराभवानंतर चाहत्यांनी आणि क्रिकेटपंडितांनी यासाठी संघाच्या रणनीतीला जबाबदार धरले आणि कोहलीवर बरीच टीकाही झाली.

Former Selector Sarandeep Singh
...अन् विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ भरकटला

खरं तर, न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर कोहलीने एक विधान केले होते आणि म्हटले होते की, सामन्यादरम्यान आपला संघ धैर्य दाखवू शकला नाही. यानंतर भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी मनोबलावरून संघावर निशाणा साधला होता आणि कर्णधाराने असे वक्तव्य करू नये, असे म्हटले होते. पराभवानंतर कर्णधाराने संघासाठी चांगल्या गोष्टी कराव्यात जेणेकरून पुढील सामन्यांसाठी खेळाडूंचे मनोबल वाढू शकेल.

टी-20 वर्ल्ड कपसाठी धोनीने भारतीय संघात मेंटॉर म्हणून प्रवेश केला होता, पण धोनीचा अनुभवही भारतीय संघासाठी काम करत नाही. उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जवळपास संपल्या आहेत. भारताला त्यांचे उर्वरित सामने तसेच मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. याशिवाय इतर संघांच्या निकालावरही अवलंबून रहावे लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com