Relationship: नातेसंबंधांमध्ये 'या' गोष्टी सामान्य मानू नका, महिलांमध्ये वाढू शकते इमोशनली ट्रिगर

Relationship: कोणतेही नातं टिकून ठेवण्यासाठी विश्वास आणि प्रेम असणे गरजेचे असते.
Relationship
RelationshipDainik Gomantak

relationship tips common things in relationship which can trigger women emotionally

प्रत्येक नात्यात छोटे-मोठे भांडण होतात, पण अशा परिस्थितीत तुमची प्रतिक्रिया खूप महत्त्वाची असते. अनेक वेळा आपल्या जोडीदाराची अशी कोणतीही गोष्ट किंवा कृती आपल्याला खूप वाईट वाटते आणि आपण रागावतो तर कधी निराश होतो.

असे पुन्हा पुन्हा होत असेल तर त्याचा परिणाम नातेसंबंधावर होऊ लागतो. मग नात्यातील प्रेम कमी होऊ लागते, फक्त एकमेकांबद्दलचा राग आणि चिडचिड उरते. नातेसंबंधांमध्ये पुरुष रागात बोलून मोकळे होतात तर महिला कधीकधी यामुळे दुखावतात.

  • इमोशनल ट्रिगर म्हणजे काय?

घर, ऑफिस, नातेसंबंध आणि इतर अनेक गोष्टींमुळे मनात विविध प्रकारचे विचार येत असतात, परंतु जेव्हा तुमचे शरीर आणि मन एखाद्या गोष्टीने दुखावले जाते आणि तुम्ही त्यावर प्रतिक्रिया देतात, तेव्हा या परिस्थितीला इमोशनल ट्रिगर म्हणतात. यामध्ये व्यक्तीचे वागणे विचित्र होते. त्याच्या हृदयाचे ठोके वाढतात आणि तो स्वतःवरील नियंत्रण गमावतो.

  • इमोशनल ट्रिगरची कारणे

असुरक्षितता

नात्यात असुरक्षितता असेल तर आनंद आणि शांती कमी होते. त्यामुळे अनेकवेळा लोकांमध्ये विनाकारण भांडण सुरू होते. ही गोष्ट महिलांना इमेशनल ट्रिगल बनवतात. त्यामुळे एकामागून एक संशय घेणे यासारख्या समस्या सुरू होतात.

एकटेपणा

नातेसंबंधातील एकटेपणा देखील महिलांना इमोशनल ट्रिगर बनवतात. महिलांचा स्वभाव पुरुषांपेक्षा वेगळा असतो. पुरुषांना तितकासा एकटेपणा जाणवत नसला तरी महिलांना याचा खूप त्रास होतो. त्यांच्या मनात विविध प्रकारचे विचार येऊ लागतात. यामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो.

सोशल मिडिया

तुम्ही सारखे सोशल मिडियाचा वापर करत असाल तर तुम्हाला इमोशनल ट्रिगर या समस्येला सामोरे जावे लागू शकते. तुम्ही दोघेही एकमेकांना वेळ देत नसाल तर नात्यावर त्याचा वाईट परिणाम होतो.

इमोशनल ट्रिगर टाळण्यासाठी काय करावे

  • जर तुम्हालाही वाटत असेल की नात्यातील छोट्या छोट्या गोष्टींबद्दल तुम्ही हायपर झालात तर तुम्हाला एक छोटा ब्रेक हवा आहे. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींसाठी वेळ काढावा. यामुळे एक तुमच्या मनाला शांती मिळेल.

  • तुमच्या आत सुरू असलेले विचार तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत शेअर करू शकता. यामुळे तणाव आणि दुःख देखील कमी होण्यास मदत मिळते.

  • सामाजात मोकळे बोलले पाहिजे. अनेक वेळा लग्नानंतर महिला आपले आयुष्य पती आणि मुलांपर्यंत मर्यादित ठेवतात. यामुळे त्यांना सतत एकाच कामामुळे चिडचिड्या होतात आणि तणाव वाढू लागतो. ही समस्या कमी करण्यासाठी मित्र-मैत्रिणींना भेटा, बोला आणि मजा करण्यासाठी वेळ काढा.

  • तणाव कमी करण्यासाठी आपले छंद जपासावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com