आयुष्यात यश मिळत नसेल तर गुरूवारी करा 'हे' खास उपाय

आयुष्यात भरपूर पैसा आणि आनंद मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी कोणते उपाय करावे हा जाणून घेऊया.
Guruwar Upay
Guruwar UpayDainik Gomantak
Published on
Updated on

Guruwar Upay: काही लोक रात्रंदिवस मेहनत करूनही त्यांना कामात यश मिळत नाही आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. पैसा आला तरी खिसा रिकामाच राहतो. याचे प्रमुख कारण म्हणजे कुंडलीत गुरूची कमजोरी असणे. यामुळे आनंद आणि सौभाग्य कमी होते. ज्यामुळे माणूस भरपूर पैसा मिळवूनही रिकाम्या हाताने राहतो.

यासाठी बृहस्पति ग्रहाचे काही उपाय करून तुम्ही हा ग्रह मजबूत करू शकता आणि ग्रह दोषांपासूनही मुक्ती मिळवू शकता. बृहस्पति ग्रहाचा आशीर्वाद मिळताच जीवनात यश, सुख, सौभाग्य आणि धनप्राप्ती होते. आयुष्यात येणारे सर्व अडथळे हळूहळू दूर होतात. भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मी घरी येतात. चला जाणून घेऊया ते कोणते उपाय केल्याने गुरु ग्रह मजबूत स्थितीत येतो.

  • घरी पूजेनंतर हळदीचा टिळा लावा

जर नोकरी-व्यवसायात यश मिळत नसेल तर गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करा. पूजेच्या खोलीत हळदीची माळ लटकवावी. यासोबतच पिवळे कपडे घालावे. हाताच्या मनगटावर व मानेवर हळदीचा छोटा टिळा लावावा. असे केल्याने कुंडलीत गुरूची स्थिती मजबूत होते. जीवनातील समस्या आणि संकटे संपतात.

  • आर्थिक समस्या कमी होते

गुरुवारी सूर्योदयाच्या वेळी स्नान करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. बृहस्पती देवाची कथा वाचा. या दिवशी देवाला केळी अर्पण करा. यासोबतच पिवळी फुले अर्पण करून हरभरा डाळ आणि गूळ अर्पण करावा. भगवान विष्णूच्या सहस्नानामाचे पठण करणे देखील शुभ आहे. हा उपाय केल्याने जीवनातील पैशाची कमतरता दूर होईल. तुम्हाला जीवनात आनंद आणि सौभाग्य मिळेल.

Guruwar Upay
Gardening Hacks Tips: जर तुम्हाला हिवाळ्यात झाडे हिरवीगार ठेवायची असेल तर वापरा 'हे' होममेड लिक्विड
  • सुख आणि सौभाग्यामध्ये वाढ

गुरुवारी पिवळे कपडे परिधान करून केळीच्या झाडाची पूजा करावी. भगवान विष्णूची कथा वाचण्यासोबतच केळीच्या मुळामध्ये हरभरा डाळ आणि गूळ अर्पण करावे. देशी तुपाचे पाच दिवे लावून जल अर्पण करावे. असे केल्याने सुख आणि सौभाग्य प्राप्त होते. भगवान विष्णूच्या कृपेने भाग्य उजळते. सर्व प्रकारच्या अडचणी आणि अडथळे दूर होतात.

  • व्यवसायात वाढ आणि नोकरीत यश

नोकरीत प्रमोशन, पगार आणि व्यवसायात वाढ न झाल्याने चिंतेत असाल तर गुरुवारी पिवळी फुले, नारळ, हळद आणि कच्चे मीठ पिवळ्या कपड्यात बांधून मंदिराच्या पायरीवर ठेवावे. हे काम करत असताना येताना किंवा जाताना कोणाशीही बोलू नका. हे उपाय केल्यास जीवनात प्रगतीचा मार्ग खुला होईल. गरिबी दूर होईल आणि प्रगती साधेल.

  • गुरु दोष कमी होईल

गुरुवारी नियमितपणे अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकावी. तसेच मनातल्या मनात 'ओम नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा जप करा. असे केल्याने कुंडलीत गुरुची स्थिती मजबूत होते. गुरूचा दोष दूर होतो. माणसाला जीवनात प्रगती आणि यश मिळते.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com