Bhandari Community In Goa: भंडारी समाजाने एकसंध होऊन काम करावे; सुदीप ताम्हणकर

Bhandari Samaj: समाजाच्या विकासासाठी नवीन नेतृत्वाला संधी देणे गरजेचे आहे
Bhandari Samaj: समाजाच्या विकासासाठी नवीन नेतृत्वाला संधी देणे गरजेचे आहे
Bhandari SamajDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मागील चार वर्षांपासून भंडारी समाजाचे काम ठप्प झाले आहे. परंतु भंडारी समाजाच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी समाजाने एकसंध होऊन काम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन खासगी बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी केले. ते आझाद मैदान येथे माध्यमांशी बोलत होते.

ताम्हणकर म्हणाले, बहुजन समाजातील प्रत्येक समाजात गट-तट निर्माण झाले आहेत. गोमंतक भंडारी समाजाची ऑनलाईन बैठक घेऊन पदावर असलेले अशोक नाईक व इतर कार्यकाळ संपुष्टात आला तरी देखील अजून निवडणूक प्रक्रियेला सुरवात करण्यात आली नाही.

आता समाजाच्या विकासासाठी नवीन नेतृत्वाला संधी देणे गरजेचे आहे. त्यासाठी भंडारी समाजाचे ज्येष्ठ नेते रवी नाईक यांनी पुढाकार घेत बेतोडा येथे स्नेहमेळाव्याचे आयोजन केले असून भंडारी समाजातील सर्वांनी मोठ्या प्रमाणात या मेळाव्याला यावे.

Bhandari Samaj: समाजाच्या विकासासाठी नवीन नेतृत्वाला संधी देणे गरजेचे आहे
Bhandari Community In Goa: भंडारी समाजाच्या निवडणूक, सभेला न्यायालयाची स्थगिती

भंडारी समाजाला राजकीय आरक्षण द्यावे

ज्याप्रमाणे एससी समाजाला राजकीय आरक्षण आहे, एसटी समाजाला राजकीय आरक्षण देण्यात येणार आहे, त्याप्रमाणे भंडारी समाजाला देखील राजकीय आरक्षणाची गरज असून उद्या होणाऱ्या स्नेहमेळाव्यात या विषयावर प्रामुख्याने चर्चा करण्यात येणार असल्याचे ताम्हणकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com