शिरोडा, छत्रपती शिवाजी महाराजांकडून आजच्या राजकारण्यांनी खूप काही शिकण्यासारखे आहे. जनतेला स्वाभिमानाने आणि ताठ मानेने जगण्याचे बळ शिवाजी महाराजांनी दिले.
ते सच्चे राजकारणी होते. दीनदुबळे आणि माता-भगिनींबद्दल त्यांच्या मनात आदराची भावना होती. साऱ्या प्रजेचे हित त्यांनी जोपासले, असे प्रतिपादन शिरोड्याचे माजी सरपंच अमित शिरोडकर यांनी केले.
थळ-शिरोडा येथील श्री कामाक्षी कला विजयते या संस्थेतर्फे गुरुवार (ता. २८) तिथीप्रमाणे आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शिरोडकर बोलत होते.
याप्रसंगी संजय पर्वतकर, खुशाली बांदोडकर, सुरेश शिरोडकर, उमेश नाईक, चंद्रशेखर शिरोडकर, लक्ष्मीकांत सुर्लकर, रूपेश नाईक, उमेश नाईक, चंद्रशेखर शिरोडकर, लक्ष्मीकांत सुर्लकर, रूपेश नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
शिरोडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाला प्रारंभ केला. संजय पर्वतकर यांनी स्वागत केले, तर उमेश नाईक यांनी आभार मानले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.