पणजी : कदंबा पठारावरील बायंगिणी कचरा प्रकल्प स्थलांतरीत करावा. याठिकाणी दोन हजार फ्लॅट आहेत, तेथील लोकांचे आरोग्य या प्रकल्पामुळे धोक्यात येईल. त्याशिवाय रुग्णालय, करमळी तळे असून प्रकल्पाचा विपरित परिणाम त्यांच्यावर होईल, असे सांगत प्रस्तावित कचरा प्रकल्प स्थलांतरित करावा, अशी मागणी कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी केली.
सायंकाळच्या सत्रात राज्यपालाच्या अभिभाषणावर फळदेसाई यांनी मत प्रदर्शीत केले. त्यावेळी ते म्हणाले की, बायंगिणी कचरा प्रकल्पाची आमच्या मतदारसंघात गरज नाही. ज्याठिकाणी तो प्रस्तावित आहे, त्या ठिकाणी मठ, लोकवस्ती, तळे, रुग्णालय आहे, हे ध्यानात घ्यायला हवे. त्यामुळे तो प्रकल्प स्थलांतरित केला जावा. त्याचबरोबर गोव्याला स्वतंत्र होऊन 60 वर्षे झाली तरी अनेक वाड्यांवर एक तासभरही पाणी मिळत नाही.
यापूर्वीच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडून राज्यात चोवीस तास पाणी मिळेल, असे सांगितले जात होते. परंतु आताच्या मंत्र्यांनी ते शक्य नसल्याचे सांगत वास्तव दर्शविले आहे. परंतु आमच्या मतदारसंघात बेटांवर वस्ती आहे, अनेक ठिकाणी पाणी मिळत नाही. दोन दिवसाआड पाणी लोकांना मिळत आहे, याचा सरकारने विचार करावा, अशी मागणीही फळदेसाई यांनी केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.