पणजी स्मार्ट सिटीची कामे आता ३१ मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करावी लागणार आहेत. लोकांच्या हिताचे हे प्रकल्प पूर्ण होऊन त्यांचे शहरी भागातील राहणीमान सुलभ होण्यास हातभार लागणार असल्याने त्यासंबंधी आलेल्या विनंत्यांची दखल घेऊन, केंद्र सरकारने हे उर्वरित दहा टक्के प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मार्चअखेरपर्यंत मुदत वाढविली आहे.
त्यामुळे आता ‘स्मार्ट सिटी’ची कामे पुढील वर्षांपर्यंत चालणार असल्याचा वारंवार ‘गोमन्तक’ने वर्तवलेला अंदाज आता खरा ठरला आहे.
पणजीतील दहा टक्के कामे पूर्ण होणे बाकी आहेत, यात काही सर्वात महत्त्वाची कामे आहेत. ‘स्मार्ट सिटीज मिशन’ हा देशातील शहरी विकासातील एक अभिनव प्रयोग आहे. जून २०१५ मध्ये त्याची स्थापना झाल्यापासून, मिशनने अनेक नावीन्यपूर्ण कल्पनांचा प्रयत्न केला आहे.
शंभर स्मार्ट शहरांच्या निवडीसाठी शहरांमध्ये स्पर्धा, भागधारक-चालित प्रकल्प निवड, अंमलबजावणीसाठी स्मार्ट सिटी स्पेशल पर्पज व्हेइकल्सची निर्मिती, तंत्रज्ञान आणि सुधारणेसाठी डिजिटल उपाय, शहरी शासन, प्रीमियर शैक्षणिक आणि व्यावसायिक संस्थांद्वारे तृतीय-पक्ष प्रभाव मूल्यांकन करण्यात आले.
पणजीत प्रकल्प अंमलबजावणीच्या स्थितीत आहेत. जमिनीवर निर्माण झालेल्या विविध परिस्थितीमुळे प्रकल्प उभारणीस विलंब झाला आहे. लोकहिताचे हे प्रकल्प असल्याने ते पूर्ण करण्यासाठी मागितलेल्या मुदतीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. उर्वरित दहा टक्के प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडला (आयपीएससीडीएल) मुदत मिळाली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.