विषारी सिरप प्यायल्याने पाच जणांचा मृत्यू; एकाची प्रकृती चिंताजनक!

Gujarat Crime: गुजरातमध्ये मिथाइल अल्कोहोल असलेले विषारी सिरप प्यायल्याने 5 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण आजारी पडले.
Crime News
Crime NewsDainik Gomantak

Gujarat Crime: गुजरातमध्ये मिथाइल अल्कोहोल असलेले विषारी सिरप प्यायल्याने 5 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण आजारी पडले. आजारी लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. गुजरातमधील खेडा येथे ही घटना घडली आहे. लोकांनी हे सिरप एका किराणा दुकानातून विकत घेतले होते. मृत हे बागडू आणि बिलोदरा गावातील असल्याचे सांगण्यात येत आहे. पाचही मृत्यू दोन दिवसांच्या कालावधीत झाले. एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. हे सिरप आयुर्वेदिक कंपनीचे असल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, गुजरातमधील खेडा जिल्ह्यात मिथाइल अल्कोहोल असलेल्या विषारी आयुर्वेदिक सिरपच्या संशयास्पद सेवनामुळे गेल्या दोन दिवसांत किमान पाच जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. सिरप पिलेल्या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खेडा जिल्ह्यातील नडियाद शहराजवळील बिलोदरा गावातील एका दुकानदाराने 'कलमेघसव - आसव अरिष्ट' या नावाने ब्रँड केलेले आयुर्वेदिक सिरप सुमारे 50 लोकांना विकल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Crime News
Gujarat Crime: सुरत हादरलं! 8 वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण करुन रिक्षाचालकाने केलं घाणेरडं कृत्य

खेडा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक राजेश गढिया यांनी सांगितले की, गावकऱ्यांच्या रक्ताच्या नमुन्याच्या अहवालावरुन सिरपमध्ये मिथाइल अल्कोहोल मिसळले गेल्याची पुष्टी झाली आहे. गेल्या दोन दिवसांत सिरप प्यायल्याने पाच जणांना जीव गमवावा लागला आहे, तर दोघांवर उपचार सुरु आहेत. या घटनेच्या चौकशीसाठी दुकानदारासह तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे ज्ञात आहे की, मिथाइल अल्कोहोल एक विषारी पदार्थ आहे.

Crime News
Gujarat Crime: बनावट PMO अधिकारी गजाआड, शाळेत प्रवेश मिळवून मोठ्या रकमेची फसवणूक केल्याचा आरोप

राज्याचे डीजीपी विकास सहाय यांनी सांगितले की, सिरपमध्ये मिथेनॉल असू शकते. त्यामुळे सिरप पिणाऱ्या लोकांचा मृत्यू होऊ शकतो. याप्रकरणी सुमारे पन्नास जणांची चौकशी करण्यात आली आहे, ज्यांना हे सिरप टॉनिक देण्यात आले होते. दुकानदार किशोरच्या वडिलांनीही हे सिरप सेवन केले होते. त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सिरपचा दर 130 रुपये आहे. दुकानदाराने ते 100 रुपयांना विकत घेतले होते. घटनेचा तपास करण्यात येत आहे. सिरप प्यायल्यानंतर छातीत दुखत असल्याची तक्रार पीडित महिलांनी केली. 27 ते 28 नोव्हेंबर दरम्यान पाचही जणांचा मृत्यू झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com