10 years of 2011 world Cup Sehwag tweeted the moment of a lifetime
10 years of 2011 world Cup Sehwag tweeted the moment of a lifetime  
क्रीडा

10 years of 2011 world Cup: सेहवागने ट्विट केला आयुष्याचा 'तो' एक क्षण

गोमन्तक वृत्तसेवा

2011 वर्ल्डकप जिंकून भारतीय क्रिकेट संघाने दहा वर्षे पूर्ण केली असतील, पण दरवर्षी 2 एप्रिलची तारीख येताच या भव्य विजयाच्या आठवणी पुन्हा चाहत्यांच्या मनामध्ये नव्याने उमटतात. वीरेंद्र सेहवागनेही भारतीय संघ वर्ल्ड चॅम्पियन झाल्याच्या विलक्षण आठवणीने ट्विट केले आहे. "2 एप्रिल: 10 वर्षांपूर्वी, आयुष्याचा एक क्षण." असे सेहवागने लिहिले आहे.

2 एप्रिल 2011 रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेला 6 गडी राखून हरवून भारतीय संघाने दुसर्‍यांदा विश्वचषक जिंकला. या शीर्षकासह भारताने वर्ल्ड कपचा 28 वर्षांचा विक्रम मोडला होता. 28 वर्षाआधी कपिल देवच्या नेतृत्वात वेस्ट इंडिजला पराभूत करून भारताने प्रथमच वल्ड कप जिंकाला होता. 

2011 च्या वर्ल्ड फायनलमध्ये सेहवाग आपले खाते उघडू शकला नाही परंतु संपूर्ण टुर्नामेंटम्ध्ये त्याच्या बॅटची कमाल त्याने दिखविली होती.  सेहवागने 8 सामन्यात 47 च्या सरासरीने आणि 122 च्या स्ट्राइक रेटने 380 धावा केल्या होत्या.  स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये 7 व्या स्थानावर होता. या स्पर्धेत त्याने बांगलादेशविरुद्ध 175 धावांची शानदार खेळीही केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT