Valpoi Traffic Problem Dainik Gomantak
गोवा

Valpoi: 'राजकीय नेते' येतात तेंव्हा रस्ते मोकळे, इतरवेळी 'ट्रॅफिक जाम'; वाळपईतील व्यथा, पोलिसांच्या दुर्लक्षाने ग्रामस्थांना त्रास

Valpoi Road Traffic: वाहतूक आराखड्याची अधिसूचना करण्यात न आल्यामुळे वाहतुकीचे नियोजन करणे शक्य नसल्याचे कारण पुढे करून प्रशासन नेहमीच हात झटकत असल्याचे पहावयास मिळत आहे.

Sameer Panditrao

वाळपई: वाळपई शहरातील वाहतूक समस्या सुटलेली नाही. गेल्या पंधरा वर्षापासून वाळपई शहरांमध्ये सातत्याने वाहतुकीचे कोंडी होत असल्यामुळे त्याचा सर्वसामान्यांना फटका लोकांना बसत आहे. पोलिस, नगरपालिका याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहे. वाळपईतील रस्ते मोकळा श्वास कधी घेणार अशी विचारणा नागरिक करीत आहेत.

जेव्हा मंत्री किंवा महनीय व्यक्ती वाळईत येतात, त्या दिवशी कुठेही वाहतूक कोंडी होत नाही, सर्व सुरळीत असते. फक्त त्याच दिवशी वाहतूक पोलिस यंत्रणा कार्यरत असते, इतर दिवशी कोणीही लक्ष देत नाहीत. त्यामुळे वाहने कुठेही उभी केली जातात, सगळीकडे बेशिस्तपणा असतो. त्यामुळे वाहतूक कोंडी होते.

वाहतूक आराखड्याची अधिसूचना करण्यात न आल्यामुळे वाहतुकीचे नियोजन करणे शक्य नसल्याचे कारण पुढे करून प्रशासन नेहमीच हात झटकत असल्याचे पहावयास मिळत आहे. मात्र सोमवारी राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांची भेट निश्चित झाल्यामुळे वाळपई शहराचे नेहमीच गजबजणारे रस्ते मोकळे होते.

त्या दिवशी रस्त्याने मोकळा श्वास घेतल्याचे पहावयास मिळाले. यामुळे निदान एक दिवस तरी वाळपई शहरातील वाहतूक सुटसुटीत झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. राज्यपालाच्या भेटीमुळे वाहतूक सुरळीत होऊ शकते, तर इतर दिवसांनी का होऊ शकत नाही? अशा सवाल मात्र सर्वसामान्यांकडून ऐकायला मिळत आहे.

सत्तरी तालुक्याची वाळपई हे महत्त्वाचे व प्रमुख बाजारपेठ या ठिकाणी शाळा, कॉलेजेस, सरकारी कार्यालय असल्यामुळे ग्रामीण भागातील जनता वाळपई शहरांमध्ये आपल्या कामासाठी येत असतात. खासकरून विद्यालयात येणाऱ्या मुलामुळे सातत्याने वाळपई शहराची वाहतूक कोंडी होताना दिसत असते.

यामुळे सर्वसामान्याची डोके दुखी वाढत असते. अनेक वेळा वाहतूक आराखड्याचे नियोजन करण्यात यावे, अशी मागणी करून सुद्धा त्याकडे विशेष लक्ष देण्यात येत नाही. अनेक वेळा या संदर्भाच्या मागण्या करण्यात आल्या. मात्र या मागणीची गांभीर्याने लक्ष देण्यात येत नाही.

वाहन चालकांना शिस्त हवी!

वाहतूक कोंडीचा सर्वसामान्याबरोबरच विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बघताना दिसत आहे. नागरिकांना प्रत्येक दुकानांसमोर वाहने पार्क करून सामान खरेदी करण्याची सवयी लागली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी पालिकेबरोबरच पोलिस खात्यानेही सतर्क राहिले पाहिजे, वाहन चालकांना शिस्त लावली पाहिजे. पार्किंगची समस्या निकालात काढली पाहिजे, असे मत ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात! कारची दुचाकीला धडक, महिलेचा जागीच मृत्यू

Goa Assmbly Live: थकबाकीदारांसाठी प्रीपेड स्मार्ट मीटर बसवा; आमदार निलेश काब्राल यांची मागणी

नाव, आडनावात बेकायदेशीरपणे बदल कराल तर खबरदार; तीन वर्षापर्यंत होऊ शकते शिक्षा, अधिवेशनात लक्षवेधी

IND vs ENG: रवींद्र जडेजाची गोलंदाजी अन् जो रुटचा रेकॉर्ड, रचला नवा इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिलाच!

Mohammed Siraj: मिया भाईची 'मायसेल्फ' स्टोरी...! ऐतिहासिक विजयानंतर मोहम्मद सिराजची प्रतिक्रिया; 'त्या' आठवणीने झाला भावूक VIDEO

SCROLL FOR NEXT