पणजी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याने त्यानिमित्त पर्वरीत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. छत्रपतींच्या कार्याविषयी जनजागृती करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
जेणेकरून त्यांची मूल्ये व दृष्टीकोनाला मूर्त स्वरूप देण्यासाठी प्रेरित करणे शक्य होईल. यावेळी महाराजांच्या पुतळ्याला पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली व त्यानंतर पर्वरी परिसरातून संध्याकाळी ढोलताशाच्या वाद्याने पदयात्रा काढण्यात आली.
या राज्याभिषेक कार्यक्रमानिमित्त संशोधक, साहित्यिक व आंतरराष्ट्रीय वक्ते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची ‘युद्ध रणनिती’ या विषयावर व्याख्यान दिले. विद्याप्रबोधिनी शिक्षण संकुल येथे सायंकाळी हा कार्यक्रम झाला.
संध्याकाळी ५.३० वा. पर्वरी येथे पदयात्रा काढण्यात आली. त्यामध्ये पर्यटनमंत्री रोहन खंवटे सहभागी झाले होते. या पदयात्रेत मोठ्या प्रमाणात पर्वरीतील लोक सामील झाले होते. पर्वरी रायझिंग व शिव सोहळा समिती यांच्यासोबत आयोजनकर्ते दीपा क्रिएशन्स संस्थेने केलेल्या आवाहनानुसार मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.