Paddy crops take a hit after heavy rain in Goa
Paddy crops take a hit after heavy rain in Goa 
गोवा

भातशेतीच्या नुकसानीचा कृषी खाते घेणार आढावा

प्रतिनिधी

पणजी: मुसळधार पावसामुळे राज्यातील भातशेतीला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी भातशेती आडवी झाली आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा आता कृषी खाते घेणार आहे, अशी माहिती कृषी खात्याकडून मिळाली.

सप्टेंबर महिना संपत आला तरी राज्यात पावसाचा जोर चांगलाच आहे. त्यामुळे यंदाचा रब्बी हंगाम तर लांबणीवर पडण्याचीच चिन्हे निर्माण झाली आहेत. भात शेतीच्या बाबतची स्थिती पावसामुळे अधिक गंभीर झाली आहे. ज्या ठिकाणी भाताची लागवड उशिरा करण्यात आली आहे. तेथे नुकसानाचा अधिक धोका नसल्याचे कृषी तज्ञांचे मत आहे. मात्र गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणच्या शेतीचे झालेले नुकसान आता कृषी खाते पाहणार आहे.

कृषी खात्यातून मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांनी खात्याकडून बियाणे पेरणीसाठी घेतली आहेत. खात्याकडून वांगी, मुळा, पालक, वाल यासारख्या भाज्यांची पिके स्थानिक शेतकऱ्यांनी घ्यावीत म्हणून प्रयत्न सुरु आहेत. भाजीपाल्याला बाजारपेठ देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही फलोत्पादन महामंडळ कार्यरत राहणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी खरीप हंगामात २४ हजार हेक्टर जमिनीत भातपिकाची लागवड करण्यात आली होती. राज्यातील पडीक जमिनी अधिकाधिक प्रमाणात शेतीसाठी वापरल्या जाव्यात म्हणून जनजागृती करण्याचे कार्यही कृषी खाते करणार आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Supreme Court: राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या सदस्यांना कोर्टाने फटकारले; आदेशाच्या उल्लंघनबाबत बजावली अवमानाची नोटीस

Goa Today's Live News: भाजप सरकार सिद्धी नाईक खून प्रकरणाचा गेल्या तीन वर्षात छडा लावण्यात अपयशी ठरले -काँग्रेस

SCROLL FOR NEXT