Water Conservation Of Natural Resources Dainik Gomantak
गोवा

Water Conservation: राज्यातील नैसर्गिक जलस्रोतांच्या संवर्धनाची गरज; जल तज्ज्ञांचे मत

दैनिक गोमन्तक

Water Conservation: राज्य शासन तसेच स्थानिक लोकांच्या सहभागाने पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची गरज आहे. सर्रासपणे होत असलेली डोंगर कापणी, बांधकामे, सखल भागांचे काँक्रीटीकरण आणि पावसाच्या पाण्याची साठवण आणि संवर्धन करण्याची यंत्रणा नसणे, हे गोव्यासाठी मारक ठरेल, असे मत जलसंवर्धन तज्ज्ञांनी ‘सडेतोड नायक’ या गोमन्तक टी.व्ही.वरील कार्यक्रमात व्यक्त केले.

जलसंपदा आणि जलसंधारण क्षेत्रातील चार तज्ज्ञांशी गोव्यातील जलसंकटाबाबत ‘गोमन्तक’चे संपादक संचालक राजू नायक यांनी मान्यवरांशी संवाद साधला.

संदीप नाडकर्णी (जलसंपदा विभागाचे माजी मुख्य अभियंता) म्हणाले, गोवा येथे सरासरी ३००० मि.मी. पाऊस पडतो. परंतु पश्चिम घाटाच्या भौगोलिक स्थितीमुळे पाऊस पडताच, पाणी नदी आणि समुद्रात जाते.

हे पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी आमच्याकडे एक योजना आहे, जी योग्य दृष्टिकोनातून राबविण्याची गरज आहे. सामुदायिक वापर आणि नैसर्गिक जलस्रोतांचे जतन करण्याच्या पारंपरिक पद्धती गावकऱ्यांनी सुरू करण्याची गरज आहे. म्हादईच्या पाणी वळविणे हे गोव्याच्या पाण्याच्या स्थितीसाठी घातक ठरेल.

हायड्रोजियोलॉजीच्या तज्ज्ञ डायना तावारीस म्हणाल्या, गोव्यात चार महिने पाऊस पडतो आणि उर्वरित आठ महिने आपण पाणी वापरतो. पण आपण जेवढे पाणी वाचवू शकतो, तेवढी बचत करण्याची वेळ आली आहे. पाण्याचा उगम, पाणीसाठा इत्यादींची योग्य माहिती लोकांना असावी, असे मला वाटते.

सरकार सर्वसामान्यांना पाणीपुरवठा करण्याऐवजी उद्योगांना, हॉटेलांना पाणीपुरवठा करत असून त्यामुळे सर्वसामान्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी नाही. सखल भागांचे काँक्रीटीकरण आणि डोंगर कापत राहिल्यास ते जलस्रोतांसाठी धोकादायक ठरेल.

टेकड्यांचे काँक्रीटीकरण, बेसुमार बांधकामे ही काही कारणे आहेत ज्यामुळे आपले पाण्याचे नैसर्गिक स्रोत वेगाने कोरडे होत आहेत. बहुतेक पठारांवर उद्योग उभे राहिले आहेत, ज्यात प्रत्यक्षात पाण्याचे पुनर्भरण होत असे.

नैसर्गिंक स्रोताचा वापर करा

डॉ. दत्ताराम देसाई म्हणाले, पश्चिम घाटाच्या किनारपट्टीवर वसलेले गोवा राज्य पुरेसा पाऊस आणि पाण्याच्या उपलब्धतेच्या बाबतीत खूप भाग्यवान आहोत. पाणी वाचवण्याची आणि पुनरुज्जीवित करण्याची आपल्या पूर्वजांची दृष्टी आजच्या पिढीत अभावानेच दिसते आहे.

या लोकशाहीत आजच्या पिढीने पाणी वाचवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी केलेले सर्व समाज आधारित उपक्रम सोडून दिले आहेत. त्यामुळे पाणी टंचाई होते, पूर्वीच्या पद्धतीने काम केले पाहिजे.

तलाव, झरे, विहिरी इत्यादी पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांचा जास्तीत जास्त वापर झाला पाहिजे. जेथे पाण्याचे स्रोत नाहीत, तेथेच नळाचे पाणी दिले जावे. आपल्या पूर्वजांनी कुळागारांची व्यवस्था सुंदरपणे अमलात आणली. जिथून पाणी भातशेतीपर्यंत जाईल.

भूजल पुनर्भरणाला महत्त्व द्या!

पर्यावरण कार्यकर्ते अभिजीत प्रभुदेसाई म्हणाले, गोव्याला पाण्याची सर्वांत मोठी समस्या भेडसावत आहे. जलसंपदा विभागाने प्रथम जलस्रोतांचा अभ्यास करून भूजल पुनर्भरणाची ठिकाणे ओळखावीत.

पाण्याचे नैसर्गिक स्रोत संरक्षित केले पाहिजेत. मात्र दुर्दैवाने सरकार पाण्याचे स्रोत नष्ट करत आहे. लोकांच्या अति लोभामुळे गोव्यात पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. आपल्या पूर्वजांनी ज्या पारंपरिक जल पुनर्भरण क्षेत्राला स्पर्श केला नाही, तो आता काही लोभी व्यक्तींमुळे नष्ट होत आहेत.

जलस्रोत खाते फक्त पाण्याचा वापर करत आहे, पण ते या जलस्रोतांच्या पुनर्भरणाला महत्त्व देत नाहीत. लोकांना नळाचे पाणी मिळू लागल्यापासून नैसर्गिक जलस्रोतांचा वापर बंद झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

शाळकरी मुलांच्या बाबतीत आपण किती जागरूक, शिक्षित आणि गंभीर आहोत?

SCROLL FOR NEXT