पणजी: गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा तयार करण्यासाठी राज्य सरकारने आज १० मार्च २०२१ पर्यंत मुदत वाढवून मागितली आहे. तसा अर्ज राज्य सरकारने राष्ट्रीय हरित लवादासमोर सादर केला. हा आराखडा तयार करण्याची मुदत फेब्रुवारीमध्येच संपली होती.
कोविड महामारी आणि पावसाळी वातावरण यामुळे आराखडा तयार करण्याचे काम मागे पडल्याचे कारण सरकारने दिले आहे. चेन्नई येथील केंद्र सरकारच्या संस्थेकडे हे काम सोपविण्यात आले आहे. या परवान्याअभावी किनारी भागातील बांधकाम परवाने आणि इमारत दुरुस्ती परवाने अडले आहेत.
संपादन: ओंकार जोशी
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.